शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचेही प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गारपिटीसह वादळी पावसामुळे दादर, गहू ही पिके भुईसपाट झाली आहेत. इतर अनेक भागांमध्ये केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने, शिरसोली, दापोरा, वडली, वावडदा, फुपनगरी, खेडी, भोकर, कठोरा, भादली या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वाऱ्याचा वेगही तब्बल ४० किमी प्रति तास असल्याने, अवघ्या तासाभराचा पावसातच गहू व दादरचे पीक भुईसपाट झाले आहे. रब्बीची पिके ऐन काढणीवर असतानाच, शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरिपानंतर रब्बी हंगामही गेला वाया

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपाची भर रब्बी हंगामात काढू, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन कापणीवर आली असतानाच, निसर्गाने केलेल्या थैमानामुळे आता रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडली, वावडदा भागात गारपीट

तालुक्यातील वडली, वावडदा, बिलवाडी या भागांत गारपीटही झाली आहे. यामुळे हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ७०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हसावद भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशात ढगांची गर्दी होताच शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

शेतांमध्ये सर्व पिके ऐन काढण्यावर असतानाच, शनिवारी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी करताच, शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाआधीचा गहू, हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मशिने शेतात दाखल करून पीक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाणे, फुपनगरी, खेडी या भागांत अचानक पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला माल शेतातच ओला होताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.