शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचेही प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गारपिटीसह वादळी पावसामुळे दादर, गहू ही पिके भुईसपाट झाली आहेत. इतर अनेक भागांमध्ये केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने, शिरसोली, दापोरा, वडली, वावडदा, फुपनगरी, खेडी, भोकर, कठोरा, भादली या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वाऱ्याचा वेगही तब्बल ४० किमी प्रति तास असल्याने, अवघ्या तासाभराचा पावसातच गहू व दादरचे पीक भुईसपाट झाले आहे. रब्बीची पिके ऐन काढणीवर असतानाच, शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरिपानंतर रब्बी हंगामही गेला वाया

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपाची भर रब्बी हंगामात काढू, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन कापणीवर आली असतानाच, निसर्गाने केलेल्या थैमानामुळे आता रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडली, वावडदा भागात गारपीट

तालुक्यातील वडली, वावडदा, बिलवाडी या भागांत गारपीटही झाली आहे. यामुळे हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ७०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हसावद भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशात ढगांची गर्दी होताच शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

शेतांमध्ये सर्व पिके ऐन काढण्यावर असतानाच, शनिवारी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी करताच, शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाआधीचा गहू, हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मशिने शेतात दाखल करून पीक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाणे, फुपनगरी, खेडी या भागांत अचानक पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला माल शेतातच ओला होताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.