शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचेही प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गारपिटीसह वादळी पावसामुळे दादर, गहू ही पिके भुईसपाट झाली आहेत. इतर अनेक भागांमध्ये केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने, शिरसोली, दापोरा, वडली, वावडदा, फुपनगरी, खेडी, भोकर, कठोरा, भादली या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वाऱ्याचा वेगही तब्बल ४० किमी प्रति तास असल्याने, अवघ्या तासाभराचा पावसातच गहू व दादरचे पीक भुईसपाट झाले आहे. रब्बीची पिके ऐन काढणीवर असतानाच, शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरिपानंतर रब्बी हंगामही गेला वाया

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपाची भर रब्बी हंगामात काढू, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन कापणीवर आली असतानाच, निसर्गाने केलेल्या थैमानामुळे आता रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडली, वावडदा भागात गारपीट

तालुक्यातील वडली, वावडदा, बिलवाडी या भागांत गारपीटही झाली आहे. यामुळे हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ७०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हसावद भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशात ढगांची गर्दी होताच शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

शेतांमध्ये सर्व पिके ऐन काढण्यावर असतानाच, शनिवारी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी करताच, शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाआधीचा गहू, हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मशिने शेतात दाखल करून पीक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाणे, फुपनगरी, खेडी या भागांत अचानक पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला माल शेतातच ओला होताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.