शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचेही प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गारपिटीसह वादळी पावसामुळे दादर, गहू ही पिके भुईसपाट झाली आहेत. इतर अनेक भागांमध्ये केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने, शिरसोली, दापोरा, वडली, वावडदा, फुपनगरी, खेडी, भोकर, कठोरा, भादली या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वाऱ्याचा वेगही तब्बल ४० किमी प्रति तास असल्याने, अवघ्या तासाभराचा पावसातच गहू व दादरचे पीक भुईसपाट झाले आहे. रब्बीची पिके ऐन काढणीवर असतानाच, शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरिपानंतर रब्बी हंगामही गेला वाया

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपाची भर रब्बी हंगामात काढू, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन कापणीवर आली असतानाच, निसर्गाने केलेल्या थैमानामुळे आता रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडली, वावडदा भागात गारपीट

तालुक्यातील वडली, वावडदा, बिलवाडी या भागांत गारपीटही झाली आहे. यामुळे हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ७०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हसावद भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशात ढगांची गर्दी होताच शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

शेतांमध्ये सर्व पिके ऐन काढण्यावर असतानाच, शनिवारी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी करताच, शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाआधीचा गहू, हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मशिने शेतात दाखल करून पीक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाणे, फुपनगरी, खेडी या भागांत अचानक पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला माल शेतातच ओला होताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.