शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत बोललो नसतो तर कदाचित 76 कोटी मिळाले नसते

By admin | Updated: March 31, 2017 18:26 IST

आपण विधानसभेत बोललो नसतो तर उर्जामंत्र्यांनी 76 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले नसते अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

एकनाथराव खडसे : 22 हजार शेतक:यांना मिळणार न्याय

जळगाव : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील कृषी पंपाच्या विद्युत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून निधी दिला जात असताना जळगाव जिल्ह्यातील 22 हजार शेतकरी वीज कनेक्शनसाठी पायपीट करीत आहे. याबाबत आपण विधानसभेत बोललो नसतो तर उर्जामंत्र्यांनी 76 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले नसते अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत 14 हजार व  नियमित 8 हजार शेतक:यांनी वीज कनेक्शनची वीज वितरण कंपनीकडे मागणी केली आहे. मात्र पायाभूत सुविधा नसल्याने महावितरण कंपनी शेतक:यांना कृषी पंपाचे कनेक्शन देत नाही. 
शेतक:यांसाठी उर्जामंत्र्यांची स्वतंत्र बैठक लावली
गेल्या अनेक वर्षापासून हे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाभोवती चकरा मारीत आहेत. आपण महसूल मंत्री असताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुडे यांच्यासोबत जळगावात स्वतंत्र बैठक घेऊन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार उर्जामंत्र्यांनी 148 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीला सव्वा वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आजर्पयत एक रुपयांचा देखील निधी मिळाला नाही. शेतक:यांच्या समस्येसंदर्भात बुधवारी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर उर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्याचे भाषणात सांगितले. कदाचित आपण शेतक:यांच्या विषयावर बोललो नसतो तर हा निधी मिळाला नसता असे त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भासाठी 350 कोटींचे अनुदान
शासनाने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपाच्या विद्युत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, श्रेणीवर्धन, सक्षमीकरण तसेच या जिल्ह्यांमध्ये पैसे भरून वीज जोडण्याकरीता प्रलंबित व संभाव्य कृषीपंप वीज जोडणीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 350 कोटी रुपयांची रक्कम महावितरण कंपनीस अनुदान स्वरुपात वितरीत करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
..तर शेतकरी आत्महत्या थांबल्या असत्या
जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांना वीज कनेक्शन दिले जात नाही. वीज वितरण कंपनीने वेळीच शेतक:यांना हे कनेक्शन दिले असते तर जिल्ह्यातील तितके क्षेत्र बागायती झाले असते. शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकरी कजर्बाजारी झाला नसता आणि जिल्ह्यातील काही आत्महत्या टळल्या असत्या.