शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत बोललो नसतो तर कदाचित 76 कोटी मिळाले नसते

By admin | Updated: March 31, 2017 18:26 IST

आपण विधानसभेत बोललो नसतो तर उर्जामंत्र्यांनी 76 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले नसते अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

एकनाथराव खडसे : 22 हजार शेतक:यांना मिळणार न्याय

जळगाव : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील कृषी पंपाच्या विद्युत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून निधी दिला जात असताना जळगाव जिल्ह्यातील 22 हजार शेतकरी वीज कनेक्शनसाठी पायपीट करीत आहे. याबाबत आपण विधानसभेत बोललो नसतो तर उर्जामंत्र्यांनी 76 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले नसते अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत 14 हजार व  नियमित 8 हजार शेतक:यांनी वीज कनेक्शनची वीज वितरण कंपनीकडे मागणी केली आहे. मात्र पायाभूत सुविधा नसल्याने महावितरण कंपनी शेतक:यांना कृषी पंपाचे कनेक्शन देत नाही. 
शेतक:यांसाठी उर्जामंत्र्यांची स्वतंत्र बैठक लावली
गेल्या अनेक वर्षापासून हे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाभोवती चकरा मारीत आहेत. आपण महसूल मंत्री असताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुडे यांच्यासोबत जळगावात स्वतंत्र बैठक घेऊन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार उर्जामंत्र्यांनी 148 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीला सव्वा वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आजर्पयत एक रुपयांचा देखील निधी मिळाला नाही. शेतक:यांच्या समस्येसंदर्भात बुधवारी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर उर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्याचे भाषणात सांगितले. कदाचित आपण शेतक:यांच्या विषयावर बोललो नसतो तर हा निधी मिळाला नसता असे त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भासाठी 350 कोटींचे अनुदान
शासनाने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपाच्या विद्युत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, श्रेणीवर्धन, सक्षमीकरण तसेच या जिल्ह्यांमध्ये पैसे भरून वीज जोडण्याकरीता प्रलंबित व संभाव्य कृषीपंप वीज जोडणीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 350 कोटी रुपयांची रक्कम महावितरण कंपनीस अनुदान स्वरुपात वितरीत करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
..तर शेतकरी आत्महत्या थांबल्या असत्या
जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांना वीज कनेक्शन दिले जात नाही. वीज वितरण कंपनीने वेळीच शेतक:यांना हे कनेक्शन दिले असते तर जिल्ह्यातील तितके क्षेत्र बागायती झाले असते. शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकरी कजर्बाजारी झाला नसता आणि जिल्ह्यातील काही आत्महत्या टळल्या असत्या.