शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

गुलाबवाडी झाली ‘चिखलवाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 22:31 IST

रहिवाशांचे प्रचंड हाल : इतर मूलभूत सुविधांचाही अभाव

नांदेड, ता. धरणगाव : येथील गुलाबवाडी या बेघर वस्तीमधील नागरिक विविध मूलभूत सुविधांअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून नरकयातना भोगत आहे. सध्या पावसाळ्यात तर रस्त्यांची बिकट स्थिती झाली आहे. भागाला भेट दिल्यानंतर ही गुलाबवाडी आहे की चिखलवाडी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ अर्तंगत येणाऱ्या या भागात जवळ जवळ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे ६० गोरगरीब कुटुंब वास्तव्यास आहेत. नांदेड हे गाव पूर्वी अमळनेर तालुक्यात असताना तत्कालीन आमदार गुलाबराव पाटील यांनी बेघर कुटुंबीयांना गावालगतच शासकीय गावठाण जागा मिळवून दिली होती . म्हणून तेथील नागरिकांनी त्या वस्तीला गुलाबवाडी असे नाव दिले आहे.या भागातील नागरी सोयीसुविधाकडे ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींचे देखील सतत दुर्लक्षच होत आले आहे. पावसाळ्यात तर सर्वत्र चिखलाचे व मोठमोठ्या डबक्यांचेच साम्राज्य असते. पायी चालतांना देखील मोठी कसरत करावी लागते. गल्ल्यांमध्ये गटारी नाहीत, धड चांगले रस्ते नाहीत व सर्वत्र घाणीचे व गवताचे साम्राज्य पसरलेले असते. परिणामी या भागातील नागरिकांचे आरोग्य नेहमीच बिघडत असते.मुख्य रस्त्याचेच झाले कामगेल्यावर्षी केवळ मुख्य गावठाण चौकापासून ते गुलाबवाडी भागापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे क्रॉँक्रिटीकरण वगळता दुसरी कोणतीही विकासाची कामे या भागात झालेली नाहीत . निवडणुकांच्या वेळी केवळ मतं मागण्यापुरतीच या भागाला लोकप्रतिनिधी भेट देऊन विविध आश्वासने देऊन निघून जातात, निवडून आल्यानंतर ढुंकूनही बघत नाहीत, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.पुनर्वसन रखडलेगुलाबवाडीचा हा भाग पाडळसरे धरणाच्या बाधित क्षेत्रात येत आहे . धरण मंजूर होऊन कित्येक वर्षांचा कालावधी उलटला तरीदेखील येथील नागरिकांचे पुर्नवसन रखडलेलेच आहे. पूनर्वसनासाठी योग्य जागा मिळावी म्हणून या भागातील नागरिक जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी लढा देत असून अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी या कामी पाहिजे तसं सहकार्य करीत नसल्याचे सांगितले जाते. यामुळे सध्यातरी त्यांचे पूनर्वसनाचे स्वप्न अधुरेच आहे.गुलाबवाडीच्या रहिवाशांची गुलाबरावांकडे अपेक्षापालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग असल्यामुळे त्यांनी लक्ष घालून गुलाबवाडीवासीयांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा येथील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे .