शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अनुदानाचा पान्हा आटला, दूध उत्पादकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:05 IST

योजना गुंडाळली

जिजाबराव वाघचाळीसगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना मध्यंतरी सरकारने प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा अंमलात आणली होती. मात्र अवघ्या सहाच महिन्यात ही योजनाच गुंडाळण्यात आल्याने ऐन दुष्काळात शेतकºयांची होरपळ होत आहे. दुष्काळी स्थितीचा विचार करता ही योजना सुरूच ठेवावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांची आहे. अनुदानाशिवाय दूध संघांना प्रती लीटर २५ रुपये देणे शक्य नसल्याचे सांगत दूध उत्पादकांकडून नाराजीचा सूर आहे.शेतकºयांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकºयांना प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. ३१ जानेवारी रोजी योजनेला अवघे १८० दिवस म्हणजेच सहा महिने होताच सरकारने तिचा गाशा गुंडळला. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनातून शेतकºयांच्या पदरात फारशे काही पडले नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करणाºया शेतकºयांना दूध अनुदान योजना बंद होण्याचा मोठा फटका बसत आहे. अनुदान बंद झाल्याने धवलक्रांतीचे अर्थकारण बिघडून दुष्काळाच्या वणव्यात शेतकºयांची होरपळही सुरू झाली आहे. सरकारने अनुदान सुरुच ठेवावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.चाळीसगावला दरदिवशी ४० हजार लीटरचे संकलनजिल्हा दूध संघाने चाळीसगाव येथे दुधाची उपलब्धता पाहता पंधरा दिवसांपूर्वी संकलन केंद्र सुरू केले असून येथे दरदिवशी ४० हजार लीटर दूध संकलित होत आहे. सद्यस्थितीत संघाकडून हे दूध २५ रुपये प्रती लीटरने खरेदी केले जात असले तरी, प्रती लीटर पाच रुपये मिळणाºया अनुदानामुळेच हे भाव देणे संघाला शक्य व्हायचे. अनुदानच बंद झाल्याने संघ खरेदी भावाबाबत काय निर्णय घेते, याकडे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.२५ रुपये प्रती लीटर भाव योग्यचारा-पाण्याची गंभीर समस्या, पशुखाद्याच्या बाजारात असणारी तेजी, गुरांचे आजारपण, वातावरणाचा होणार परिणाम इत्यादी कारणांमुळे शेतकºयांना दूध २५ रुपये प्रती लीटर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यापेक्षा कमी दर मिळाल्यास उत्पादक शेतकरी भरडून निघणार आहे. अनुदान बंद केल्याने शेतकºयांमध्ये सरकारविषयी असंतोष खदखदत आहे.संघाचे अनुदानाचे १० कोटी रुपये थकलेदूध उत्पादक शेतकºयांना सावरण्यासाठी राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१८ पासून प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरु केली. पहिल्या टप्प्याची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपण्याआधीच अनुदान योजनेला पुन्हा ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली. या सहा महिन्याच्या काळात अनुदानापोटी जिल्हा दूध संघाला अवघे ६८ लाख रुपये मिळाले असून १० कोटी रुपये सरकारकडून येणे बाकी आहे. आता अनुदानच बंद झाल्याने थकबाकी कधी मिळणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दूध संघ झळ सोसून शेतकºयांकडून २५ रुपये प्रती लीटर दराने दूध खरेदी करीत आहे.दरदिवशी सव्वा चार लाख लीटर दुधाचे संकलनजिल्हा दूध संघाकडून दरदिवशी सव्वा चार लाख लीटर दुधाचे संकलन केले जाते. यातील सव्वा दोन लाख लीटर दुधाचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकले जातात. उर्वरित दोन लाख लीटरची दूध पावडर बनवली जाते. गेल्या वर्षभरापासून दूध पावडरचे भाव कोसळले असून तेजी नसल्याने फटका सहन करावा लागत आहे.राज्यभरात प्रती दिन पाच कोटीचे अनुदानराज्यभरात विविध संस्थांमार्फत शेतकºयांकडून उत्पादीत दूध खरेदी केले जाते. प्रती दिन एक कोटी लीटर दुधाचे संकलन होते. त्यानुसार शेतकºयांना प्रती दिन पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. अनुदान योजनेला ३१ जानेवारी पर्यंत १८० दिवस पूर्ण झाले असून यापैकी फक्त ७० दिवसांचे ३५० कोटी रुपये अनुदान सरकारने अदा केले आहे. ११० दिवसांचे ५५० कोटी रुपये सरकारकडे थकल्याने गेल्या आठवड्यात अनुदान योजनेला मुदतवाढ देण्याचे दुग्ध विकासमंत्र्यांचे सूतोवाच केवळ वल्गना ठरल्याचा रोष व्यक्त होत आहे.शेतकºयांना आर्थिक झळ बसू नये. याबरोबरच दुष्काळात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अडचणी असतानाही आम्ही संघामार्फत २५ रुपये प्रती लीटरने दूध खरेदी करीत आहोत. अनुदानाचे १० कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. सहा महिन्यात ६८ लाख रुपये मिळाले आहे. सरकारने अनुदान बंद करू नये. याचा मोठा फटका दूध संघाबरोबर प्रत्यक्ष शेतकºयांनाही बसणार आहे.- प्रमोद पाटील, संचालक जळगाव जिल्हा दूध संघ

दूध उत्पादनाचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असते. अनुदान बंद झाल्याने दुधाचे दर कमी होतील. शेतकºयांना हे परवडणारे नाही.- रोहन वाघ, दूध उत्पादक उंबरखेडे, ता. चाळीसगावदुष्काळाने कंबरडे मोडले असताना सरकारने दूध अनुदान बंद करून शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. अनुदानाअभावी उत्पन्न आणि पशुपालन जिकरीचे होईल. चारा - पाणी टंचाईने अगोदरच डोके वर काढले आहे. पशुखाद्याचेही भाव चढे आहेत.- ज्ञानेश्वर अहिरे, दूध उत्पादक, उंबरखेडे ता. चाळीसगावदुष्काळामुळे अस्मानी दाह सोसणाºया शेतकºयांना दूध अनुदान बंद केल्याने सुलतानी मार सहन करावा लागणार आहे. सरकारने अनुदानाच्या निर्णयाचा फेरविचार करावा. पुढच्या काळात चारा - पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.- दिनेश पाटील, दूध उत्पादक, पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव