शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

केळी व्यापाऱ्यांकडून उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

निवेदनात म्हटले आहे की, केळी व्यापारी शेतकऱ्यांकडून बोर्ड भावापेक्षाही शंभर दोनशे रुपये कमी भावाने केळी खरेदी करतात. चायना ...

निवेदनात म्हटले आहे की, केळी व्यापारी शेतकऱ्यांकडून बोर्ड भावापेक्षाही शंभर दोनशे रुपये कमी भावाने केळी खरेदी करतात. चायना माल आहे, रास फरक देणे बंद केले आहे. वाहतूक मजुरी जास्त लावणे अशी अनेक प्रकारे केळी व्यापारी मनमानी करीत असल्याच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येत असून त्यांनी शेतकऱ्यांना खरा न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या केळीची रक्कम दररोजच्या बोर्ड भावाप्रमाणे व्यापाऱ्यांकडून बोर्डाच्या भावानुसार देण्यात प्रत्यक्षात कृती करावी. म्हणजे रोजच्या केळी भावाच्या बोर्डानुसार जे केळी व्यापारी शेतकऱ्यांना जी रक्कम अदा करतील त्यांच्या धनादेश किंवा शेतकऱ्याला तो केळी व्यापारी किती रक्कम देत आहे याची नोंद बाजार समितीमध्ये झाल्यास पारदर्शी व्यवहार होतील, अशी केळी उत्पादकांची भूमिका आहे.

काही ठिकाणी मापात पाप

तसेच केळीचे काही व्यापारी तर केळी मोजतांना मापात पाप करून शेतकऱ्यांच्या अंदाजे पाच ते सहा क्विंटलचा केळीचा माल जास्त घेत असतात. ही वस्तुस्थिती तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना माहीत असतानासुद्धा सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर केळी व्यापारी जगत असतानाही केळी उत्पादक शेतकऱ्यांना नाना प्रकारे कारणे सांगून भाव पाडले जात आहेत. कधी कोरोनाचे कारण तर आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यामुळे केळीला उठाव नाही अशी अजब कारणे व्यापारी दाखवत आहेत. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने या केळी व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असतानाही ही प्रत्येक तालुक्यात अवैध व बिना परवाने केळी व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा डुबण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केळी व्यापाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक काटे वापरण्याचे बंधन असतानाही कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. केळीला कट्टी लावली जात आहे. जाहीर बोर्डापेक्षा कमी भावात केळी खरेदी केल्यास केळी व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून केळी व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात यावा

व सर्व व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटाचे मोजमाप करावे असे असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देत नाही. तरी लवकरात लवकर केळी व्यापाऱ्यांवर वेळीच जिल्हा उपनिबंधक यांनी कारवाई करावी.

अन्यथा शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्याभरात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष जळगाव संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, तालुकाध्यक्ष सचिन शिंपी आदी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.