शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

१५ मे नंतर जिल्ह्यातील भूजल पातळी मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

जळगाव : दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सुटका झालेल्या जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात होणारी भूजल पातळी मोजणी अर्थात मान्सूनपूर्व सर्वेक्षण १५ मे ...

जळगाव : दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सुटका झालेल्या जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात होणारी भूजल पातळी मोजणी अर्थात मान्सूनपूर्व सर्वेक्षण १५ मे नंतर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भूजल पातळीत चांगलीच वाढ असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरली. आता उन्हाळ्यात होणारी भूजल मोजणी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यामध्ये जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर महिन्यात भूजल मोजणी केली जाते. सप्टेंबर २०२० मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता सलग दोन वर्षे भूजल पातळीत वाढ झाली. गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय जानेवारी व मार्च महिन्यात देखील झालेल्या सर्वेक्षणात भूजल पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले होते.

मान्सून पश्चात सर्वेक्षणात वाढ झाल्याचे आढळून आल्यानंतर आता मान्सूनपूर्व सर्वेक्षण होणार असल्याने भर उन्हाळ्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची काय स्थिती आहे, हे समोर येऊ शकेल. त्यानुसार हे सर्वेक्षण १५ मे नंतर सुरू होणार आहे.