शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत असून यंदाही भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी १.४० मीटरने वाढली असून सर्वाधिक ४.५२ मीटरची वाढ यावल तालुक्यात झाली आहे तर सर्वात कमी ०.०२ मीटरने एरंडोल तालुक्यात पातळी वाढली आहे. १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात १.०५ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी मे महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील चोपडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता यंदा ही वाढ झाली असून गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण झाले असून या नंतर अजून मान्सून पश्चात सर्व्हेक्षण होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर आणखी वाढ दिसून येण्याची आशा आहे.

यंदा झालेल्या सर्वेक्षणानुसार यावल तालुक्यात सर्वाधिक ४.५२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्या खालोखाल मुक्ताईनगर तालुक्यात ३.६० मीटर, रावेर तालुक्यात ३.१२ मीटर, जळगाव तालुक्यात १.७६ मीटर, बोदवड तालुक्यात १.५७ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. या सोबतच अमळनेर तालुक्यात १.४६ मीटर, धरणगाव तालुक्यात १.१४ मीटर, पाचोरा तालुक्यात १ मीटर, भुसावळ तालुक्यात ०.९२ मीटर, जामनेर तालुक्यात ०.३९ मीटर, भडगाव तालुक्यात ०.२७ मीटर, चाळीसगाव तालुक्यात ०.१६ मीटर, पारोळा तालुक्यात ०.०६ मीटर, एरंडोल तालुक्यात ०.०२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे.

चोपडा तालुक्यात भूजल पातळी घटली

जिल्ह्यातील १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात ही पातळी १.०५ मीटने घटली आहे. यंदा भूजल पातळीत घट झालेल्या या तालुक्यात मे महिन्यातील मान्सूनपूर्व सर्व्हेक्षणात २.०४ मीटरने वाढ झाली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही या तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे.

------------

गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. आता मान्सून पश्चात सर्वेक्षणात आणखी आकडेवारी पुढे येईल.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक