शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत असून यंदाही भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी १.४० मीटरने वाढली असून सर्वाधिक ४.५२ मीटरची वाढ यावल तालुक्यात झाली आहे तर सर्वात कमी ०.०२ मीटरने एरंडोल तालुक्यात पातळी वाढली आहे. १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात १.०५ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी मे महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील चोपडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता यंदा ही वाढ झाली असून गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण झाले असून या नंतर अजून मान्सून पश्चात सर्व्हेक्षण होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर आणखी वाढ दिसून येण्याची आशा आहे.

यंदा झालेल्या सर्वेक्षणानुसार यावल तालुक्यात सर्वाधिक ४.५२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्या खालोखाल मुक्ताईनगर तालुक्यात ३.६० मीटर, रावेर तालुक्यात ३.१२ मीटर, जळगाव तालुक्यात १.७६ मीटर, बोदवड तालुक्यात १.५७ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. या सोबतच अमळनेर तालुक्यात १.४६ मीटर, धरणगाव तालुक्यात १.१४ मीटर, पाचोरा तालुक्यात १ मीटर, भुसावळ तालुक्यात ०.९२ मीटर, जामनेर तालुक्यात ०.३९ मीटर, भडगाव तालुक्यात ०.२७ मीटर, चाळीसगाव तालुक्यात ०.१६ मीटर, पारोळा तालुक्यात ०.०६ मीटर, एरंडोल तालुक्यात ०.०२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे.

चोपडा तालुक्यात भूजल पातळी घटली

जिल्ह्यातील १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात ही पातळी १.०५ मीटने घटली आहे. यंदा भूजल पातळीत घट झालेल्या या तालुक्यात मे महिन्यातील मान्सूनपूर्व सर्व्हेक्षणात २.०४ मीटरने वाढ झाली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही या तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे.

------------

गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. आता मान्सून पश्चात सर्वेक्षणात आणखी आकडेवारी पुढे येईल.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक