शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हाती आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:12 IST

चोपडा तालुक्यातील वास्तव : पिकपेरा नोंदीनुसार भरपाई देण्याची मागणी

चोपडा : तालुक्यात सततच्या अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातातून हंगाम गेलेला आहे. जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यात यावर्षी जवळपास अकराशे मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. नोव्हेंबर सुरू झाला तरीही सततच्या पावसाने खरीप हंगामातील मूग, उडीद, मका, कापूस, तूर, सोयाबीन यासारखी पिके नेस्तनाबूत झाली आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वाºयावर सुटला आहे. शेतक?्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शासन स्तरावर तत्काळ मदत द्यावी अशी मागणी केलेली आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व नेते, लोकप्रतिनिधी मश्गुल असताना व निकालानंतर दिवाळीचा सण सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अवकाळी पावसाने शेतातील सर्व पिके सडून खराब झाली आहेत. एवढेच नाही तर जनावरांसाठी चाराही सडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र सध्यातरी तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी तथा मंडळ अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून संथ गतीने पंचनामे सुरू आहेत. शेतकरी चिंतेत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे जाणवते.यासोबतच नवनिर्वाचित आमदार व पक्षीय नेते हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कोण होणार यात गुंतलेले आहेत. त्यांनाही शेतकºयांकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसते आहे. गेल्या दहा वर्षात कधी नव्हे एवढा पाऊस यावर्षी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता उशीर झाल्याने दुसरा रब्बी हंगामही हातून जाण्याची भीती तालुक्यातील शेतकरी वर्तवीत आहेत. याबाबत दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.