शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पुराने हिरावला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

चाळीसगाव- पुराने घातलेल्या थैमानानंतर मनुष्य, जनावरे व मालमत्ता यांची मोठी हानी तालुक्यात झाली आहे. त्यापाठोपाठ शेतीचे झालेले प्रचंड ...

चाळीसगाव- पुराने घातलेल्या थैमानानंतर मनुष्य, जनावरे व मालमत्ता यांची मोठी हानी तालुक्यात झाली आहे. त्यापाठोपाठ शेतीचे झालेले प्रचंड नुकसान समोर येत आहे. काही ठिकाणी पिकांचा फक्त बुडकाच उरलेला तर कपाशी,ऊस व इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झालेली अशी भयानक अवस्था या तालुक्यातील अनेक गावातील शेतीची झालेली आहे.

शेतीवर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील तीस ते पत्तीस शेतकऱ्यांना या पुराचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.या गावातील शेतकरी विठाबाई रामदास पाटील या महिला शेतकरी यांची डोक्यापर्यंतची आलेली कपाशी या पुरात वाहून गेली आहे. आधीच दुष्काळाला तोंड देत शेतकऱ्याने जिवापाड जपलेले,हातातोंडाशी आलेल्या कपाशी या पुराच्या तडाख्यात पाण्यात वाहून गेली आहे. तर काहींचे आडवे पडले, जे वाचले त्याचाही दर्जा घसरला. त्यामुळे त्याचे मोलही बळीराजाच्या पदरी पडेल, याची शाश्वती नाही, हे यातून प्रकर्षाने जाणवले.

विठाबाई रामदास पाटील यांच्या दीड एकरमध्ये कपाशी व वांगेची लागवड केली होती. डोक्यावरपर्यंत आलेल्या कपाशीला २५ ते ४० टक्के पक्क्या कैऱ्या (बोंड) आलेले होते. वांगेचेही दोन बहार आले होते. शेतात ठिबकद्वारे पिकांना पाणी देत असल्यामुळे पिके चांगल्या प्रकारे फुलली होती. जिवापाड जपलेले व हातातोंडाशी आलेली कपाशी पुराच्या तडाख्याने वाहून गेल्याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठिबकच्या नळ्या गायब

यापुरात ठिबकच्या सर्व नळ्या व शेतातील ठिबकच्या नळ्याचा बंडलही वाहून गेला आहे, तसेच विहिरीला भगदाड पडल्याने नुकसान झाले. मोटारही वाहून गेली. या लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे.

याबरोबरच वाघळी येथील मधुकर बळीराम पाटील यांच्या दीड एकर शेतीतील कपाशीची तर दपाडू भानुदास पाटील यांच्या तीस गुंठ्यांवरील क्षेत्रातील ऊसाची ही अशीच अवस्था पाहायला मिळाली.अश्याप्रकारे वाघळी गावातील तीस-पत्तीस शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.गुरुवारी कृषी विभागाने या शेतातील पंचनामे केली आहेत.

दरम्यान, अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी गावात येऊन भेटी दिल्या; परंतु नुकसानग्रस्त शेतीकडे कुणी फिरकले नाही, याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

या घटनेमुळे आता शेतीत गुंतवलेले पैसे सर्व पुरात वाहून गेले आहे.आता पेरण्यासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर

आणखी वाढला असून हे कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे.

शेती करण्यासाठी आता पैसा आणायचा कोठून, असा सवाल शेतकरी करीत आहेत. शासनाने जाहीर केलेली मदत लवकर मिळावी, या आशेवरच शेतकरी अवलंबून आहे.

काही ठिकाणी शेतजमिनीत पाणी साचून आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून राहून शेतीची मशागत नव्याने करावी लागणार आहे. या उत्पादनातून मोठा फायदा मिळण्याचा विश्वासही यापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा शेतजमिनी तयार करून उत्पादन घेणे मोठे आव्हान आहे.

फोटो

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील विठाबाई रामदास पाटील यांच्या शेतातील कपाशीचे पीक पुरात वाहून गेल्यानंतर शेताची झालेली अवस्था.