शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

ग्रा. पं. निवडणुकीतून जि. प. निवडणुकीची बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

आनंद सुरवाडे जिल्ह्यातील ७८३ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात ...

आनंद सुरवाडे

जिल्ह्यातील ७८३ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना या निवडणुका आहे. ग्रामीण राजकारणावरच जिल्हा परिषदेच्या सदस्यांची अधिक धुरा असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील वेगळी गणिते मांडून अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवून जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकांमधूनच आगामी वर्षभराने होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची बांधणी करत आहेत. स्थानिक पातळीवरच अधिकाधिक वेळ देण्याचे नियोजन पदाधिकारी व सदस्यांनी केलेले आहे.

केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे पक्षांना महत्त्व असते, तेवढे महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीत नसते, या ठिकाणी स्थानिक पॅनल, व्यक्ती, यांना महत्त्व दिले जाते. पक्ष या निवडणुकांमध्ये तसा गौण विषय त्यामुळे आपल्या निवडीच्या वेळी मतांमध्ये फूट नको म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्यही स्थानिक राजकारणानुसारच स्वत:ची भूमिका बदलतील, असे एकंदरीत वातावरण आहे. कारण वर्षभराने जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून, यात आपल्याला त्रास नको, अशी एक मानसिकता या निवडणुकीत सर्व सदस्यांची राहणार आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्हा परिषदेतील त्यांच्या समर्थकांची नेमकी भूमिका काय राहणार हेही या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. अखेर स्थानिक राजकारण वेगळे राहते, या नावाखालीही हे समर्थक भाजपला खो देत खडसे गटांसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. एकनाथ खडसे यांची भूमिका, मात्र नेमकी अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर मोठा बदल दाखविण्यासाठी ही एक संधी असू शकते. या निवडणुकांवरच जिल्हा परिषदेची आगामी गणिते अवलंबून असल्याने सदस्यांनीही या निवडणुकांमध्ये गांभीर्याने लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. अनेक सदस्यांनी तर जिल्हा परिषदेतील फेऱ्या कमी केल्या आहेत. काहींनी कामे करून घेण्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत. काहींनी स्वत:च्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करण्यासाठी निधीही जाहीर केला आहे. कोरोनामुळे कामे ठप्प असल्याने दाखविण्यासारखे ठोस काही नसले तरी आगामी काळात आम्ही मोठा निधी देऊ, हा शब्द सदस्य देऊ शकणार आहेत. जर ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध झाले, तर आगामी जि. प. निवडणूक तेवढीच सुकर होणार असल्याने सदस्यांनी त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.