शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ग्रा. पं. निवडणुकीतून जि. प. निवडणुकीची बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

आनंद सुरवाडे जिल्ह्यातील ७८३ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात ...

आनंद सुरवाडे

जिल्ह्यातील ७८३ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना या निवडणुका आहे. ग्रामीण राजकारणावरच जिल्हा परिषदेच्या सदस्यांची अधिक धुरा असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील वेगळी गणिते मांडून अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवून जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकांमधूनच आगामी वर्षभराने होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची बांधणी करत आहेत. स्थानिक पातळीवरच अधिकाधिक वेळ देण्याचे नियोजन पदाधिकारी व सदस्यांनी केलेले आहे.

केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे पक्षांना महत्त्व असते, तेवढे महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीत नसते, या ठिकाणी स्थानिक पॅनल, व्यक्ती, यांना महत्त्व दिले जाते. पक्ष या निवडणुकांमध्ये तसा गौण विषय त्यामुळे आपल्या निवडीच्या वेळी मतांमध्ये फूट नको म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्यही स्थानिक राजकारणानुसारच स्वत:ची भूमिका बदलतील, असे एकंदरीत वातावरण आहे. कारण वर्षभराने जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून, यात आपल्याला त्रास नको, अशी एक मानसिकता या निवडणुकीत सर्व सदस्यांची राहणार आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्हा परिषदेतील त्यांच्या समर्थकांची नेमकी भूमिका काय राहणार हेही या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. अखेर स्थानिक राजकारण वेगळे राहते, या नावाखालीही हे समर्थक भाजपला खो देत खडसे गटांसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. एकनाथ खडसे यांची भूमिका, मात्र नेमकी अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर मोठा बदल दाखविण्यासाठी ही एक संधी असू शकते. या निवडणुकांवरच जिल्हा परिषदेची आगामी गणिते अवलंबून असल्याने सदस्यांनीही या निवडणुकांमध्ये गांभीर्याने लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. अनेक सदस्यांनी तर जिल्हा परिषदेतील फेऱ्या कमी केल्या आहेत. काहींनी कामे करून घेण्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत. काहींनी स्वत:च्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करण्यासाठी निधीही जाहीर केला आहे. कोरोनामुळे कामे ठप्प असल्याने दाखविण्यासारखे ठोस काही नसले तरी आगामी काळात आम्ही मोठा निधी देऊ, हा शब्द सदस्य देऊ शकणार आहेत. जर ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध झाले, तर आगामी जि. प. निवडणूक तेवढीच सुकर होणार असल्याने सदस्यांनी त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.