शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या रक्कमेवरील व्याज शासनाने द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:02 IST

जिल्हा बँक करणार मागणी

ठळक मुद्देव्यापारी बँकांना शासनाचे आदेशच नाहीततोडगा काढण्याचा प्रयत्नजिल्हा बँकेने शासनाकडून मागविले मार्गदर्शन

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेंतर्गत निकषानुसार पात्र थकीत रक्कमेवर १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी न करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दिले आहेत. मात्र आधीच तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेला हा भुर्दंड कशाला? असा सवाल उपस्थित झाला आहे.याबाबत जिल्हा बँक शासनाने ही व्याजाची रक्कम देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले असून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कर्जमाफी योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न केलेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीसाठी तसेच एकवेळ समझोता योजनेसाठी (ओटीएस) पात्र करण्यात आली आहे. म्हणजेच ३१ जुलै २०१७ पर्यंत व्याजाची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे. मात्र या कर्जमाफीचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने १ आॅगस्ट २०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेनुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बँकांनी करू नये, असे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दिले आहेत.शासनाचे मार्गदर्शन मागविलेशासनाच्या या आदेशामुळे आधीच तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण बँकेला सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) राखावा लागतो. त्यासोबतच बँकेतील पैसा हा ठेवीदारांचा आहे. त्यावर रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय व्याज न आकारण्याचा अधिकार बँकेला नाही. तसेच ही व्याजाची रक्कम थोडीशी नाही. किमान २५-३० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे तेवढ्या रक्कमेचा हिशेब बँकेला रिझर्व्ह बँकेला द्यावाच लागणार आहे. त्यामुळे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात जिल्हा बँकांना अडचण आहे. त्याबाबत जिल्हा बँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाने हा व्याजाचा निधी देण्याची गरज आहे.

तोडगा काढण्याचा प्रयत्नव्याज न आकारणी करण्याच्या शासनाच्या आदेशाबाबत अडचणी असल्याने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.- रोहीणी खडसे खेवलकर, अध्यक्षा, जिल्हा बँक, जळगाव.

सरकारी बँकांकडून व्याज आकारणी सुरूचएकीकडे राज्य शासन जिल्हा बँकांना कर्जमाफीच्या रक्कमेवर व्याज न आकारण्याचे आदेश देत असताना सरकारी (व्यापारी) बँकांना मात्र कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. कारण या बँका केवळ रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचेच पालन करतात. त्यामुळे या बँकांकडून या कर्जमाफीच्या रक्कमेवर व्याज आकारणी सुरूच असल्याचे समजते. अर्थात जिल्हा बँकांच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरीही ज्या उद्देशाने शासनाने हे आदेश काढले आहेत, तो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा उद्देश सफल होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारी बँकांबाबत शासन काय धोरण ठरविते? याबाबत उत्सुकता आहे.