शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्जमाफीच्या रक्कमेवरील व्याज शासनाने द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:02 IST

जिल्हा बँक करणार मागणी

ठळक मुद्देव्यापारी बँकांना शासनाचे आदेशच नाहीततोडगा काढण्याचा प्रयत्नजिल्हा बँकेने शासनाकडून मागविले मार्गदर्शन

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेंतर्गत निकषानुसार पात्र थकीत रक्कमेवर १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी न करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दिले आहेत. मात्र आधीच तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेला हा भुर्दंड कशाला? असा सवाल उपस्थित झाला आहे.याबाबत जिल्हा बँक शासनाने ही व्याजाची रक्कम देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले असून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कर्जमाफी योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न केलेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीसाठी तसेच एकवेळ समझोता योजनेसाठी (ओटीएस) पात्र करण्यात आली आहे. म्हणजेच ३१ जुलै २०१७ पर्यंत व्याजाची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे. मात्र या कर्जमाफीचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने १ आॅगस्ट २०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेनुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बँकांनी करू नये, असे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दिले आहेत.शासनाचे मार्गदर्शन मागविलेशासनाच्या या आदेशामुळे आधीच तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण बँकेला सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) राखावा लागतो. त्यासोबतच बँकेतील पैसा हा ठेवीदारांचा आहे. त्यावर रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय व्याज न आकारण्याचा अधिकार बँकेला नाही. तसेच ही व्याजाची रक्कम थोडीशी नाही. किमान २५-३० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे तेवढ्या रक्कमेचा हिशेब बँकेला रिझर्व्ह बँकेला द्यावाच लागणार आहे. त्यामुळे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात जिल्हा बँकांना अडचण आहे. त्याबाबत जिल्हा बँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाने हा व्याजाचा निधी देण्याची गरज आहे.

तोडगा काढण्याचा प्रयत्नव्याज न आकारणी करण्याच्या शासनाच्या आदेशाबाबत अडचणी असल्याने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.- रोहीणी खडसे खेवलकर, अध्यक्षा, जिल्हा बँक, जळगाव.

सरकारी बँकांकडून व्याज आकारणी सुरूचएकीकडे राज्य शासन जिल्हा बँकांना कर्जमाफीच्या रक्कमेवर व्याज न आकारण्याचे आदेश देत असताना सरकारी (व्यापारी) बँकांना मात्र कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. कारण या बँका केवळ रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचेच पालन करतात. त्यामुळे या बँकांकडून या कर्जमाफीच्या रक्कमेवर व्याज आकारणी सुरूच असल्याचे समजते. अर्थात जिल्हा बँकांच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरीही ज्या उद्देशाने शासनाने हे आदेश काढले आहेत, तो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा उद्देश सफल होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारी बँकांबाबत शासन काय धोरण ठरविते? याबाबत उत्सुकता आहे.