शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा मोडून पडतोय कणा तरी शासन म्हणतेय लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

विजयकुमार सैतवाल स्टार ९२८ जळगाव : विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत भावी पिढी घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर दिवसेंदिवस अशैक्षणिक कामांचा भार ...

विजयकुमार सैतवाल

स्टार ९२८

जळगाव : विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत भावी पिढी घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर दिवसेंदिवस अशैक्षणिक कामांचा भार वाढत आहे. शिक्षक मंडळीही त्याला नकार न देता कामांचा स्वीकार करतात. मात्र, हा भार दिवसेंदिवस वाढत असल्याने शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावरदेखील परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.

शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना किती अशैक्षणिक कामे करावी लागतात, याचा आढावा घेतला असता पूर्वी जनगन, निवडणूक कामे, खिचडी शिजविणे या सोबतच आता कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विविध कामे शिक्षकांवर सोपविली गेल्याचे शिक्षकांतर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा - १८२८

एकूण शिक्षक - ७३८९

शिक्षकांची कामे

- कोरोनामुळे शाळा भरणे बंद असल्याने खिचडी शिजविली जात नसली तरी धान्याचे वाटप करावे लागते.

- निवडणुकीची कामे, जनगणना

- माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण

- पल्स पोलिओ लसीकरण

- रेशन दुकानावर नियुक्ती

- कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती

- चेक पोस्टवर तपासणी

एक शिक्षकी शाळेचे हाल

ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, तेथे तर शिक्षकांचे चांगलेच हाल होतात. प्रत्यक्षात शासन निर्णयानुसार एक शिक्षकी शाळा नाहीत. मात्र, ज्या ठिकाणाहून कोणाची बदली झाली असेल, तेथे दुसरा शिक्षक येईपर्यंत प्रतीक्षा असते. त्यामुळे एकाच शिक्षकाला काम करावे लागते. त्यात अशैक्षणिक कामे वाढल्यास अधिकच हाल होतात.

शिक्षण सोडून इतर कामांसाठी किमान एक शिक्षक

१) शैक्षणिक कामांव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे वाढत असल्याने बहुतांश शाळांमध्ये अशा कामांसाठी किमान एक शिक्षक अडकून जात असल्याचे सांगितले जात आहे.

२) जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य विभाग असतानाही शिक्षकांना या कामांना लावले गेल्याचे सांगण्यात आले.

३) शालेय पोषण आहार शिजवून नोंदी ठेवणे, बांधकामाच्या कामांवर लक्ष ठेवून रेकॉर्ड ठेवणे अशी कामे करण्यात शिक्षक अडकतात.

कोरोना काळात कहरच केल्याचा दावा

शासनाने शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. निवडणुकीची कामे, जनगणना, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण, पल्स पोलिओ लसीकरण, याशिवाय कोविड काळात या कामांनी कहरच केला. शिक्षकांना रेशन दुकानावर नियुक्ती, कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती, चेक पोस्टवर नियुक्ती यासारखी कामे करावी लागली. त्यामुळे अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

कित्येक वर्षांपासून शिक्षक अनेक अशैक्षणिक कामे करीत आहेत. त्यामुळे शिकवण्याचा मूळ उद्देश बाजूला राहत असल्याने गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करून या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी.

- डॉ. विजय बागुल, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक महासंघ

सध्या शाळांमध्ये खिचडी शिजविणे बंद असले तरी धान्य वाटप सुरूच आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवणे व इतर कामे ऑनलाईन शिक्षण देऊन सांभाळावे लागतात. शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे देऊ नये. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर होतो.

- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना