शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

वाळूचोरीला प्रशासनाचा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:51 IST

वार्तापत्र-महसूल

-सुशील देवकरजिल्ह्यात सुरू असलेल्या वाळूचोरीला प्रशासनाचाच आर्शीवाद असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले असून वडनगरी शिवारात वाळूच्याडंपरने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने बोटचेपे धोरण अवलंबले त्यावरून वाळू चोरीला प्रशासनाचाच आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक गिरणा नदीपात्रात जळगाव तालुक्यात एकही ठेका गेलेला नाही. आधी वैजनाथचा ठेका होता. तो देखील एरंडोल तालुक्यात होता. त्यातही प्रचंड अवैध वाळू उपसा करून जळगाव शहरात त्याची अवैध वाहतूक जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादानेच करण्यात आली. त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील वाळू ठेका परिसरातील १० किमी परिसरातून अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे वाळू माफियांशी असलेले सख्य कारवाईच्या आड येत गेले. टॉवरचौकाकडून वर्दळीच्या रस्त्याने ही अवजड वाहने सर्रास ये-जा करीत होते. त्यासाठी दोन ठिकाणी गिरणा नदीपात्रात अवैधपणे भराव टाकून रस्ताही करण्यात आला. मात्र डोळेच मिटून घेतलेल्या प्रशासनाला याची माहिती असण्याचे कारणच नाही. वाळूची चोरटी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांच्या धडकेने निरपराध नागरिकांचे बळी जात असूनही तातडीने दखल घेण्याची गरज जिल्हा प्रशासनाला वाटली नाही. गेल्या वर्षभरापासून दोनगाव ठेका परिसरातील दहा किमी परिसरात गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा सुरू असून जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. मग महसूल विभागाच्या अधिकाºयांनी कधीच या भागात चक्कर मारली नाही का? की सोयीस्करपणे कानाडोळा केला? एरव्ही सामान्य नागरिकाने थोडे जरी नियमबा' वर्तन केले तर त्याला नियम दाखवित धडा शिकवणाºया महसूल प्रशासनाला नदीपात्रात टाकलेले अवैध रस्ते देखील दिसले नाहीत का? दोनगाव ठेक्यापर्यंत महसूल विभागाचे अधिकारी वर्षभरात एकदाही तपासणीसाठी गेलेच नाहीत का? जर गेले तर त्यांना त्यावेळी हे गैरप्रकार दिसले नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. आता सप्टेंबर अखेर ठेक्यांची मुदतच संपत आहे. त्यातच गिरणा नदीपात्रात पाणी असल्याने महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे हात वर केले आहे. महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाºयापासून ते वरिष्ठांपर्यंत तसेच पोलीस व वाळू माफिया अशी साखळीच असल्याने कोणत्याच अवैध वाळू व्यावसायिकावर वेळेवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. ठेक्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीने वाळू उपसा होऊन गेल्यावरच महसूल विभाग मोजणीसाठी पोहोचतो. त्यानंतर नोटीस बजावून कारवाईचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा कितीतरी पट मलिदा आधीच लाटला गेलेला असतो. कुंपणच शेत खात असल्याने प्रतिबंध करणार कोण? असा सवाल आहे.