शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

वाळूचोरीला प्रशासनाचा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:51 IST

वार्तापत्र-महसूल

-सुशील देवकरजिल्ह्यात सुरू असलेल्या वाळूचोरीला प्रशासनाचाच आर्शीवाद असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले असून वडनगरी शिवारात वाळूच्याडंपरने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने बोटचेपे धोरण अवलंबले त्यावरून वाळू चोरीला प्रशासनाचाच आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक गिरणा नदीपात्रात जळगाव तालुक्यात एकही ठेका गेलेला नाही. आधी वैजनाथचा ठेका होता. तो देखील एरंडोल तालुक्यात होता. त्यातही प्रचंड अवैध वाळू उपसा करून जळगाव शहरात त्याची अवैध वाहतूक जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादानेच करण्यात आली. त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील वाळू ठेका परिसरातील १० किमी परिसरातून अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे वाळू माफियांशी असलेले सख्य कारवाईच्या आड येत गेले. टॉवरचौकाकडून वर्दळीच्या रस्त्याने ही अवजड वाहने सर्रास ये-जा करीत होते. त्यासाठी दोन ठिकाणी गिरणा नदीपात्रात अवैधपणे भराव टाकून रस्ताही करण्यात आला. मात्र डोळेच मिटून घेतलेल्या प्रशासनाला याची माहिती असण्याचे कारणच नाही. वाळूची चोरटी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांच्या धडकेने निरपराध नागरिकांचे बळी जात असूनही तातडीने दखल घेण्याची गरज जिल्हा प्रशासनाला वाटली नाही. गेल्या वर्षभरापासून दोनगाव ठेका परिसरातील दहा किमी परिसरात गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा सुरू असून जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. मग महसूल विभागाच्या अधिकाºयांनी कधीच या भागात चक्कर मारली नाही का? की सोयीस्करपणे कानाडोळा केला? एरव्ही सामान्य नागरिकाने थोडे जरी नियमबा' वर्तन केले तर त्याला नियम दाखवित धडा शिकवणाºया महसूल प्रशासनाला नदीपात्रात टाकलेले अवैध रस्ते देखील दिसले नाहीत का? दोनगाव ठेक्यापर्यंत महसूल विभागाचे अधिकारी वर्षभरात एकदाही तपासणीसाठी गेलेच नाहीत का? जर गेले तर त्यांना त्यावेळी हे गैरप्रकार दिसले नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. आता सप्टेंबर अखेर ठेक्यांची मुदतच संपत आहे. त्यातच गिरणा नदीपात्रात पाणी असल्याने महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे हात वर केले आहे. महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाºयापासून ते वरिष्ठांपर्यंत तसेच पोलीस व वाळू माफिया अशी साखळीच असल्याने कोणत्याच अवैध वाळू व्यावसायिकावर वेळेवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. ठेक्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीने वाळू उपसा होऊन गेल्यावरच महसूल विभाग मोजणीसाठी पोहोचतो. त्यानंतर नोटीस बजावून कारवाईचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा कितीतरी पट मलिदा आधीच लाटला गेलेला असतो. कुंपणच शेत खात असल्याने प्रतिबंध करणार कोण? असा सवाल आहे.