शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

धुळ्यात वॉटरग्रेसला रामराम, तर जळगावात का नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

जळगाव शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका नाशिक येथील वॉटरग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, सुरूवातीपासूनच शहरातील अनियमित साफसफाई बाबत ...

जळगाव शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका नाशिक येथील वॉटरग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, सुरूवातीपासूनच शहरातील अनियमित साफसफाई बाबत नागरिकांमधुन तक्रारी करण्यात येत आहे. जळगाव मनपासह धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. धुळ्यातही वॉटरग्रेसला दोन वर्षांपूर्वी ठेका देण्यात आला होता. ठेका देतेवेळी विविध अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. मात्र, वॉटरग्रेसकडून अटी-शर्तीचा भंग होत असल्याने नोटीस देण्यासह १० ते १५ लाखापर्यंत दंडही ठोठावण्यात आला होता. तसेच घंटागाडीचे वजन वाढविण्यासाठी माती टाकण्याचा प्रकार, कचरा संकलनात अनियमितता, घंटागाडीच्या नियोजनाचा अभावी आदी तक्रारी वाढल्याने, धुळे महापालिकेने ७ जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटरग्रेसच्या जागी रिलायबल या कंपनीला कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

इन्फो :

जळगावात सत्ताधारींकडून अभय का

जळगावात वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासूनच भाजपात काही नगरसेवकांनी विरोध केला होता. यामुळे भाजपा नगरसेवकांमध्येच दोन गट पडले होते. यावर आमदार गिरीश महाजनांनी मध्यस्थी करुन नगरसेवकांचे मनोमिलन घडवुन आणले असले तरी, काही नगरसेवकांचा या ठेक्याला विरोधचं आहे. तसेच सध्या स्थितीलाही शहरातील स्वच्छतेची समस्या कायम आहे. मात्र जळगावात भाजपकडून वॉररग्रेसचा ठेका रद्द न करता, अभय का. ? ? ? ? ? ?.असा प्रश्न भाजपातील काही नगरसेवकांकडूनचं उपस्थित केला जात आहे.

इन्फो :

तर दोन्ही ठिकाणी गिरीश महाजनांचेच नेतृत्व

जळगावसह धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. आमदार गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कामकाज सुरू आहे. सत्ता मिळविण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेवर भर देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाजनांच्या नेतृत्वाखाली जळगाव व धुळे या दोन्ही ठिकाणी वॉटरग्रेसला मक्ता देण्यात आला आहे. मात्र, कामात सुधारणा होत नसल्यामुळे, धुळ्यातून वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जळगावतातही असाच प्रकार सुरू असतांना, या वॉटरग्रेसचा ठेका अद्याप का रद्द झाला नाही, वॉटरग्रेसला अभय का ? असा प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.