शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भोवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:03 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे...

दोरीला गुंडाळून भोवरा फिरवण्यात त्यावेळी वेगळी मजा वाटायची. भोवऱ्याभोवती गुंडाळलेली दोरी जेवढ्या जास्त जोरात ओढली जाईल तेवढा जास्त वेळ भोवरा फिरायचा. भोवरा फिरण्यालासुद्धा त्याला असलेली आर (टोकदार खिळा) कशी आहे, ती किती आत किंवा बाहेर आहे, तसेच त्याची जाडी किती आहे हेसुद्धा जबाबदार असते. तसाच तो कोणत्या प्रकारच्या पृष्ठ भागावर फिरतोय यावर त्याचे फिरणे अवलंबून असते. त्यामुळे तो जोरात फिरला तरी काही वेळा एका जागेवर स्थिर असतो, तर काही वेळा क्षणाक्षणाला जागा बदलतो. तसेच आपल्या स्वत:भोवती फिरताना काही वेळा ईतर गोष्टींभोवतीसुद्धा फिरतो असे लक्षात येते.सगळे भोवरा कसा फिरतो किंवा तो कसा फिरवावा हे सांगण्यासाठी नाही तर आपले आयुष्यसुद्धा या भोवºयासारखेच आहे हे जाणवले म्हणून लिहीत आहे.भोवरा फिरण्यासाठी जशी एका दोरीची गरज असते व ती दोरी भोवºयाभोवती गुंडाळावी लागते त्याशिवाय भोवरा फिरत नाही. तसेच माणसाचेही आहे. माणूस एक भोवरा आहे व तो दिवसभर आपल्याच समस्या सोडवायला फिरत असतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याचे त्या दिवसासाठीचे फिरणे थांबते.सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, समस्या याला तो तोंड देत असतो. अगदी आॅफिस, व्यवसाय या ठिकाणी निघणे, रहदारी, प्रवास साधने, पार्किंग समस्या, मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत कसे शिकवावे याचा विचार, तरुण असेल तर नोकरी व व्यवसायाचा भेडसावणारा प्रश्न, थोडे स्थिरावले असतील तर कर्जाने घेतलेले घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तुंच्या हप्त्यांची पगाराशी किंवा उत्पन्नाशी घातलेली सांगड.परिवारात असलेले कार्यक्रम, आजारपण, ज्येष्ठांचा सांभाळ या करता करावी लागणारी धावपळ. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे ठरविले असेल तर त्यासाठी केलेली आर्थिक तडजोड. याशिवाय बदलीची नोकरी असल्यास ठरावीक काळाने होणारी बदली त्यानंतर परत बसवलेली संसाराची घडी, याशिवाय कामाचे तास, त्या ठिकाणच्या अडचणी, त्रास, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळ, अंतर्गत स्पर्धा यातही हल्ली नवरा बायको दोघेही काम करणारे असतात. त्यामुळे काही वेळा समस्यांमध्ये वाढ होत असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याभोवती असलेली व आपल्याला गुंडाळली जाणारी दोरी होय आणि ही दोरी ओढल्या गेल्यावर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माणूस भोवºयासारखा सतत आपल्याभोवती फिरत असतो. यातील काही समस्या रोज सुटतात तर रोज पुन्हा नव्याने निर्माण होतात, तर काही सुटण्यास बराच काळ लागतो. त्यातच माणसाचे दिवस, आठवडे, महिने, वर्षे संपत असतात. अशी अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा तो स्थिरावल्यासारखा वाटतो तेव्हा माणूस नावाच्या भोवºयाची फिरण्याची गती कमी झालेली असते. नंतर तो फिरायचा थांबतो. पण असे थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते. या स्वत:सह परिवाराभोवती फिरण्यात त्याच्या आयुष्याची जवळपास ६० वर्षे संपत आलेली आहेत आणि आता तो समस्यांचा दोरीचा जोर कमी झाला म्हणून नाही तर थकलाय म्हणून थांबलाय...-कौस्तुभ परांजपे, जळगाव 

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव