शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भोवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:03 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे...

दोरीला गुंडाळून भोवरा फिरवण्यात त्यावेळी वेगळी मजा वाटायची. भोवऱ्याभोवती गुंडाळलेली दोरी जेवढ्या जास्त जोरात ओढली जाईल तेवढा जास्त वेळ भोवरा फिरायचा. भोवरा फिरण्यालासुद्धा त्याला असलेली आर (टोकदार खिळा) कशी आहे, ती किती आत किंवा बाहेर आहे, तसेच त्याची जाडी किती आहे हेसुद्धा जबाबदार असते. तसाच तो कोणत्या प्रकारच्या पृष्ठ भागावर फिरतोय यावर त्याचे फिरणे अवलंबून असते. त्यामुळे तो जोरात फिरला तरी काही वेळा एका जागेवर स्थिर असतो, तर काही वेळा क्षणाक्षणाला जागा बदलतो. तसेच आपल्या स्वत:भोवती फिरताना काही वेळा ईतर गोष्टींभोवतीसुद्धा फिरतो असे लक्षात येते.सगळे भोवरा कसा फिरतो किंवा तो कसा फिरवावा हे सांगण्यासाठी नाही तर आपले आयुष्यसुद्धा या भोवºयासारखेच आहे हे जाणवले म्हणून लिहीत आहे.भोवरा फिरण्यासाठी जशी एका दोरीची गरज असते व ती दोरी भोवºयाभोवती गुंडाळावी लागते त्याशिवाय भोवरा फिरत नाही. तसेच माणसाचेही आहे. माणूस एक भोवरा आहे व तो दिवसभर आपल्याच समस्या सोडवायला फिरत असतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याचे त्या दिवसासाठीचे फिरणे थांबते.सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, समस्या याला तो तोंड देत असतो. अगदी आॅफिस, व्यवसाय या ठिकाणी निघणे, रहदारी, प्रवास साधने, पार्किंग समस्या, मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत कसे शिकवावे याचा विचार, तरुण असेल तर नोकरी व व्यवसायाचा भेडसावणारा प्रश्न, थोडे स्थिरावले असतील तर कर्जाने घेतलेले घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तुंच्या हप्त्यांची पगाराशी किंवा उत्पन्नाशी घातलेली सांगड.परिवारात असलेले कार्यक्रम, आजारपण, ज्येष्ठांचा सांभाळ या करता करावी लागणारी धावपळ. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे ठरविले असेल तर त्यासाठी केलेली आर्थिक तडजोड. याशिवाय बदलीची नोकरी असल्यास ठरावीक काळाने होणारी बदली त्यानंतर परत बसवलेली संसाराची घडी, याशिवाय कामाचे तास, त्या ठिकाणच्या अडचणी, त्रास, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळ, अंतर्गत स्पर्धा यातही हल्ली नवरा बायको दोघेही काम करणारे असतात. त्यामुळे काही वेळा समस्यांमध्ये वाढ होत असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याभोवती असलेली व आपल्याला गुंडाळली जाणारी दोरी होय आणि ही दोरी ओढल्या गेल्यावर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माणूस भोवºयासारखा सतत आपल्याभोवती फिरत असतो. यातील काही समस्या रोज सुटतात तर रोज पुन्हा नव्याने निर्माण होतात, तर काही सुटण्यास बराच काळ लागतो. त्यातच माणसाचे दिवस, आठवडे, महिने, वर्षे संपत असतात. अशी अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा तो स्थिरावल्यासारखा वाटतो तेव्हा माणूस नावाच्या भोवºयाची फिरण्याची गती कमी झालेली असते. नंतर तो फिरायचा थांबतो. पण असे थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते. या स्वत:सह परिवाराभोवती फिरण्यात त्याच्या आयुष्याची जवळपास ६० वर्षे संपत आलेली आहेत आणि आता तो समस्यांचा दोरीचा जोर कमी झाला म्हणून नाही तर थकलाय म्हणून थांबलाय...-कौस्तुभ परांजपे, जळगाव 

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव