शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भला माणूस माणुसकी जपतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:53 IST

गेल्या चार-पाच वर्षांपासून तो गावात आलाय. कधी बसस्थानकावर तर कधी कॉलेजच्या बसस्टॉपवर फिरताना दिसतो. दाढी वाढलेला, उंचपुरा, कळकट-मळकट कपडे घातलेला, पांढरी दाढी वाढलेला. इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा कागद हाती घेतलेला भला माणूस नजरेला पडतो. कधी मंदिरासमोरच झोपून गेलेला. असा हा अवलिया माणूस प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो.

रस्त्यानं जाणारी माणसं कधी पैसे देतात, तर कधी बिस्किटचा पुडा हाती ठेवतात. आज मात्र तो माणूस बसस्टॉपमध्ये झोपूनच होता. सतत दिवसभर फिरणारा दोन दिवसांपासून तिथेच पडून होता. तसं हे गाव हायवेला लागून असल्यानं अनेक मनोरूग्ण गावात येतात अन् निघून जातात. पण हा माणूस गेल्या चार-पाच वर्षांपासून वास्तव्याला आहे. कुणाला त्रास नाही.‘काय जेवण केलं का?’ तरूण.‘ताप हाये राजा माले.’तरूण मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन आला. पाण्याची बाटली दिली. त्यानं गोळी घेतली तेवढ्यात दुसरा वेडसर माणूस त्याच्याजवळ आला. त्यानं प्लॅस्टिकच्या थैलीत आणलेली भाजी-भाकरी त्याला दिली. दोघं जण अगदी शहाण्या माणसांना लाजवतील, अशी जेवण करीत होती. थंडीचे दिवस असल्यानं म्हातारा कधी मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा बसथांब्याच्या निवाºयामध्ये थांबायचा. आज जास्तच थंडी असल्यानं तो थंडीत कुडकूडत होता. अधून-मधून डोकं भिंतीला टेकवून बसायचा. शेजारच्या पिशवीत हिरवी वांगी, मिरची, बटाटे भरून पडलेली. अंगावर ओढायला काहीही नाही. रात्री येणारी-जाणारी माणसं खोटा कळवळा बोलून पुढे जायची.‘काय बाबा, थंडी वाजते का?’ तरूण.वाजते नं. मंग काय कºयाचं? आज म्हातारा चांगलाच मुडमध्ये होता. ‘काय बाबा, तुमचं नाव काय?’‘विठ्ठल...’‘म्हणू थंडीनही वाजूं राहिली रे भो...’म्हातारा एवढ्या रात्री पेपरमधील बातमी वाचत होता. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात तो वाचत बसायचा. तेव्हा रस्त्यानं जाणारे-येणारे लोक अवाक व्हायचे. तरुणानं रस्त्याच्या कडेला अंधारात जाऊन तो तुरखाट्या आणायला गेला. तेव्हा विठ्ठल म्हणाला, ‘ईचु काटा पाह्यजो भो. अंधारामधी काऊन हात घालून राह्यला भो. आम्हाले काय थंडी वाजतनी.’तरुण मुलाला विठ्ठलबद्दल जास्तच आपुलकी, प्रेम निर्माण झाले. तो घरी गेला, अन् घरून शाल घेऊन आला.‘‘घ्या विठ्ठल बोवा..’ त्यानं शाल घेऊन पोतडीवर ठेवली अन् शेकोटीवर जाऊन बसला. रात्र झाली तरूण घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार ‘कोण म्हणतं माणुसकी नाही. ज्या माणसाला समाजानं वेडा ठरवलं; तो तर शहाण्या माणसाला लाजवेल अशा गोष्टी करीत होता. त्याला ‘विठ्ठल’चे ‘ईचु काटा पाह्यजो’ हे शब्द कानामध्ये घुमत होते. गावात अनेक वेडसर लोक होते. पण हा वेगळाच माणूस आहे ही खात्री तरूणाची नव्हे तर संपूर्ण गावाची झाली होती. त्यातच त्याच्याबरोबर ‘कोंबडी चोर’ असा इसम गावात फिरायचा. पण त्याला कुणीही सहानुभूती किंवा प्रेम दाखवत नव्हतं. तो सतत हायवेवर चालत राहायचा. कधी या गावात तर उद्या दुसºया गावात. त्यामुळे तो एका गावात राहत नव्हता. त्यातच लोकांनी त्याला ‘कोंबडीचोर’ म्हणून घोषित केलं होतं.आज भलतीच थंडी पडली होती. रस्त्यानं जाणाºया-येणाºया लोकांची संख्या कमी झाली होती. परवा-तरवा तरुण मित्रानं दिलेली शाल विठ्ठलजवळ नव्हती. तरुणानं न राहवून त्याला विचारलं,‘विठ्ठल बोवा शाल कुठीयाय?’ विठ्ठलाने बसथांब्याच्या मधल्या भागाकडे बोट दाखवलं. तर काय? जो दुसरा वेडसर माणूस ज्याला कोंबडी चोर म्हणायचे, तो पांघरून झोपला होता अन् स्वत: विठ्ठल मात्र थंडीत अंगावरच्या कपड्यांवर झोपला होता. तेव्हा तरूण म्हणाला, ‘विठ्ठल बोवा खरंच तू भला माणूसाय, खरंच तुझ्या निरागस प्रेमाला माझा सलाम, तुझ्या माणुसकीला. आज समाजातील माणुसकी हरवत असताना विठ्ठला ऽ तू मात्र ‘माणुसकी जोपासतोय’, खरंच तू भला माणूसाय’ कोण? कोठला? विठ्ठल पण नंतर समजलं. तो हिंगणघाटचा आहे. पण डोक्यावर परिणाम झाल्याने तो गावात आलाय. कधी कोणाला मागणार नाही. पण माणसं त्याला न मागता पैैसे देतात. हॉटेलवाले कचोरी, भजे, समोसे देतात. पण विठ्ठल ते तिथे कधी खात नाही. बसथांब्यावर येऊन आपल्याबरोबर असणारे दोन जण यांच्याबरोबर खातो. जवळ असलेली ५०-६० रुपयांची चिल्लर मुक्ताई पालखीबरोबर आलेल्या भगिनीला देतो. तेव्हा तर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी स्टॉपवर कालीपिली चालवणाºया ड्रायवर लोकांनाही चहा पाजतो. रस्त्यानं रडत असलेल्या मुलाला खिशातील बिस्टीटपुडा देतो. असा हा ‘भला माणूस’ खरंच माणुसकी अन् माणसांसाठी आपुलीचा विषय आहे.- अ.फ. भालेराव, मुक्ताईनगर