शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

भला माणूस माणुसकी जपतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:53 IST

गेल्या चार-पाच वर्षांपासून तो गावात आलाय. कधी बसस्थानकावर तर कधी कॉलेजच्या बसस्टॉपवर फिरताना दिसतो. दाढी वाढलेला, उंचपुरा, कळकट-मळकट कपडे घातलेला, पांढरी दाढी वाढलेला. इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा कागद हाती घेतलेला भला माणूस नजरेला पडतो. कधी मंदिरासमोरच झोपून गेलेला. असा हा अवलिया माणूस प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो.

रस्त्यानं जाणारी माणसं कधी पैसे देतात, तर कधी बिस्किटचा पुडा हाती ठेवतात. आज मात्र तो माणूस बसस्टॉपमध्ये झोपूनच होता. सतत दिवसभर फिरणारा दोन दिवसांपासून तिथेच पडून होता. तसं हे गाव हायवेला लागून असल्यानं अनेक मनोरूग्ण गावात येतात अन् निघून जातात. पण हा माणूस गेल्या चार-पाच वर्षांपासून वास्तव्याला आहे. कुणाला त्रास नाही.‘काय जेवण केलं का?’ तरूण.‘ताप हाये राजा माले.’तरूण मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन आला. पाण्याची बाटली दिली. त्यानं गोळी घेतली तेवढ्यात दुसरा वेडसर माणूस त्याच्याजवळ आला. त्यानं प्लॅस्टिकच्या थैलीत आणलेली भाजी-भाकरी त्याला दिली. दोघं जण अगदी शहाण्या माणसांना लाजवतील, अशी जेवण करीत होती. थंडीचे दिवस असल्यानं म्हातारा कधी मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा बसथांब्याच्या निवाºयामध्ये थांबायचा. आज जास्तच थंडी असल्यानं तो थंडीत कुडकूडत होता. अधून-मधून डोकं भिंतीला टेकवून बसायचा. शेजारच्या पिशवीत हिरवी वांगी, मिरची, बटाटे भरून पडलेली. अंगावर ओढायला काहीही नाही. रात्री येणारी-जाणारी माणसं खोटा कळवळा बोलून पुढे जायची.‘काय बाबा, थंडी वाजते का?’ तरूण.वाजते नं. मंग काय कºयाचं? आज म्हातारा चांगलाच मुडमध्ये होता. ‘काय बाबा, तुमचं नाव काय?’‘विठ्ठल...’‘म्हणू थंडीनही वाजूं राहिली रे भो...’म्हातारा एवढ्या रात्री पेपरमधील बातमी वाचत होता. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात तो वाचत बसायचा. तेव्हा रस्त्यानं जाणारे-येणारे लोक अवाक व्हायचे. तरुणानं रस्त्याच्या कडेला अंधारात जाऊन तो तुरखाट्या आणायला गेला. तेव्हा विठ्ठल म्हणाला, ‘ईचु काटा पाह्यजो भो. अंधारामधी काऊन हात घालून राह्यला भो. आम्हाले काय थंडी वाजतनी.’तरुण मुलाला विठ्ठलबद्दल जास्तच आपुलकी, प्रेम निर्माण झाले. तो घरी गेला, अन् घरून शाल घेऊन आला.‘‘घ्या विठ्ठल बोवा..’ त्यानं शाल घेऊन पोतडीवर ठेवली अन् शेकोटीवर जाऊन बसला. रात्र झाली तरूण घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार ‘कोण म्हणतं माणुसकी नाही. ज्या माणसाला समाजानं वेडा ठरवलं; तो तर शहाण्या माणसाला लाजवेल अशा गोष्टी करीत होता. त्याला ‘विठ्ठल’चे ‘ईचु काटा पाह्यजो’ हे शब्द कानामध्ये घुमत होते. गावात अनेक वेडसर लोक होते. पण हा वेगळाच माणूस आहे ही खात्री तरूणाची नव्हे तर संपूर्ण गावाची झाली होती. त्यातच त्याच्याबरोबर ‘कोंबडी चोर’ असा इसम गावात फिरायचा. पण त्याला कुणीही सहानुभूती किंवा प्रेम दाखवत नव्हतं. तो सतत हायवेवर चालत राहायचा. कधी या गावात तर उद्या दुसºया गावात. त्यामुळे तो एका गावात राहत नव्हता. त्यातच लोकांनी त्याला ‘कोंबडीचोर’ म्हणून घोषित केलं होतं.आज भलतीच थंडी पडली होती. रस्त्यानं जाणाºया-येणाºया लोकांची संख्या कमी झाली होती. परवा-तरवा तरुण मित्रानं दिलेली शाल विठ्ठलजवळ नव्हती. तरुणानं न राहवून त्याला विचारलं,‘विठ्ठल बोवा शाल कुठीयाय?’ विठ्ठलाने बसथांब्याच्या मधल्या भागाकडे बोट दाखवलं. तर काय? जो दुसरा वेडसर माणूस ज्याला कोंबडी चोर म्हणायचे, तो पांघरून झोपला होता अन् स्वत: विठ्ठल मात्र थंडीत अंगावरच्या कपड्यांवर झोपला होता. तेव्हा तरूण म्हणाला, ‘विठ्ठल बोवा खरंच तू भला माणूसाय, खरंच तुझ्या निरागस प्रेमाला माझा सलाम, तुझ्या माणुसकीला. आज समाजातील माणुसकी हरवत असताना विठ्ठला ऽ तू मात्र ‘माणुसकी जोपासतोय’, खरंच तू भला माणूसाय’ कोण? कोठला? विठ्ठल पण नंतर समजलं. तो हिंगणघाटचा आहे. पण डोक्यावर परिणाम झाल्याने तो गावात आलाय. कधी कोणाला मागणार नाही. पण माणसं त्याला न मागता पैैसे देतात. हॉटेलवाले कचोरी, भजे, समोसे देतात. पण विठ्ठल ते तिथे कधी खात नाही. बसथांब्यावर येऊन आपल्याबरोबर असणारे दोन जण यांच्याबरोबर खातो. जवळ असलेली ५०-६० रुपयांची चिल्लर मुक्ताई पालखीबरोबर आलेल्या भगिनीला देतो. तेव्हा तर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी स्टॉपवर कालीपिली चालवणाºया ड्रायवर लोकांनाही चहा पाजतो. रस्त्यानं रडत असलेल्या मुलाला खिशातील बिस्टीटपुडा देतो. असा हा ‘भला माणूस’ खरंच माणुसकी अन् माणसांसाठी आपुलीचा विषय आहे.- अ.फ. भालेराव, मुक्ताईनगर