शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भला माणूस माणुसकी जपतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:53 IST

गेल्या चार-पाच वर्षांपासून तो गावात आलाय. कधी बसस्थानकावर तर कधी कॉलेजच्या बसस्टॉपवर फिरताना दिसतो. दाढी वाढलेला, उंचपुरा, कळकट-मळकट कपडे घातलेला, पांढरी दाढी वाढलेला. इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा कागद हाती घेतलेला भला माणूस नजरेला पडतो. कधी मंदिरासमोरच झोपून गेलेला. असा हा अवलिया माणूस प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो.

रस्त्यानं जाणारी माणसं कधी पैसे देतात, तर कधी बिस्किटचा पुडा हाती ठेवतात. आज मात्र तो माणूस बसस्टॉपमध्ये झोपूनच होता. सतत दिवसभर फिरणारा दोन दिवसांपासून तिथेच पडून होता. तसं हे गाव हायवेला लागून असल्यानं अनेक मनोरूग्ण गावात येतात अन् निघून जातात. पण हा माणूस गेल्या चार-पाच वर्षांपासून वास्तव्याला आहे. कुणाला त्रास नाही.‘काय जेवण केलं का?’ तरूण.‘ताप हाये राजा माले.’तरूण मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन आला. पाण्याची बाटली दिली. त्यानं गोळी घेतली तेवढ्यात दुसरा वेडसर माणूस त्याच्याजवळ आला. त्यानं प्लॅस्टिकच्या थैलीत आणलेली भाजी-भाकरी त्याला दिली. दोघं जण अगदी शहाण्या माणसांना लाजवतील, अशी जेवण करीत होती. थंडीचे दिवस असल्यानं म्हातारा कधी मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा बसथांब्याच्या निवाºयामध्ये थांबायचा. आज जास्तच थंडी असल्यानं तो थंडीत कुडकूडत होता. अधून-मधून डोकं भिंतीला टेकवून बसायचा. शेजारच्या पिशवीत हिरवी वांगी, मिरची, बटाटे भरून पडलेली. अंगावर ओढायला काहीही नाही. रात्री येणारी-जाणारी माणसं खोटा कळवळा बोलून पुढे जायची.‘काय बाबा, थंडी वाजते का?’ तरूण.वाजते नं. मंग काय कºयाचं? आज म्हातारा चांगलाच मुडमध्ये होता. ‘काय बाबा, तुमचं नाव काय?’‘विठ्ठल...’‘म्हणू थंडीनही वाजूं राहिली रे भो...’म्हातारा एवढ्या रात्री पेपरमधील बातमी वाचत होता. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात तो वाचत बसायचा. तेव्हा रस्त्यानं जाणारे-येणारे लोक अवाक व्हायचे. तरुणानं रस्त्याच्या कडेला अंधारात जाऊन तो तुरखाट्या आणायला गेला. तेव्हा विठ्ठल म्हणाला, ‘ईचु काटा पाह्यजो भो. अंधारामधी काऊन हात घालून राह्यला भो. आम्हाले काय थंडी वाजतनी.’तरुण मुलाला विठ्ठलबद्दल जास्तच आपुलकी, प्रेम निर्माण झाले. तो घरी गेला, अन् घरून शाल घेऊन आला.‘‘घ्या विठ्ठल बोवा..’ त्यानं शाल घेऊन पोतडीवर ठेवली अन् शेकोटीवर जाऊन बसला. रात्र झाली तरूण घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार ‘कोण म्हणतं माणुसकी नाही. ज्या माणसाला समाजानं वेडा ठरवलं; तो तर शहाण्या माणसाला लाजवेल अशा गोष्टी करीत होता. त्याला ‘विठ्ठल’चे ‘ईचु काटा पाह्यजो’ हे शब्द कानामध्ये घुमत होते. गावात अनेक वेडसर लोक होते. पण हा वेगळाच माणूस आहे ही खात्री तरूणाची नव्हे तर संपूर्ण गावाची झाली होती. त्यातच त्याच्याबरोबर ‘कोंबडी चोर’ असा इसम गावात फिरायचा. पण त्याला कुणीही सहानुभूती किंवा प्रेम दाखवत नव्हतं. तो सतत हायवेवर चालत राहायचा. कधी या गावात तर उद्या दुसºया गावात. त्यामुळे तो एका गावात राहत नव्हता. त्यातच लोकांनी त्याला ‘कोंबडीचोर’ म्हणून घोषित केलं होतं.आज भलतीच थंडी पडली होती. रस्त्यानं जाणाºया-येणाºया लोकांची संख्या कमी झाली होती. परवा-तरवा तरुण मित्रानं दिलेली शाल विठ्ठलजवळ नव्हती. तरुणानं न राहवून त्याला विचारलं,‘विठ्ठल बोवा शाल कुठीयाय?’ विठ्ठलाने बसथांब्याच्या मधल्या भागाकडे बोट दाखवलं. तर काय? जो दुसरा वेडसर माणूस ज्याला कोंबडी चोर म्हणायचे, तो पांघरून झोपला होता अन् स्वत: विठ्ठल मात्र थंडीत अंगावरच्या कपड्यांवर झोपला होता. तेव्हा तरूण म्हणाला, ‘विठ्ठल बोवा खरंच तू भला माणूसाय, खरंच तुझ्या निरागस प्रेमाला माझा सलाम, तुझ्या माणुसकीला. आज समाजातील माणुसकी हरवत असताना विठ्ठला ऽ तू मात्र ‘माणुसकी जोपासतोय’, खरंच तू भला माणूसाय’ कोण? कोठला? विठ्ठल पण नंतर समजलं. तो हिंगणघाटचा आहे. पण डोक्यावर परिणाम झाल्याने तो गावात आलाय. कधी कोणाला मागणार नाही. पण माणसं त्याला न मागता पैैसे देतात. हॉटेलवाले कचोरी, भजे, समोसे देतात. पण विठ्ठल ते तिथे कधी खात नाही. बसथांब्यावर येऊन आपल्याबरोबर असणारे दोन जण यांच्याबरोबर खातो. जवळ असलेली ५०-६० रुपयांची चिल्लर मुक्ताई पालखीबरोबर आलेल्या भगिनीला देतो. तेव्हा तर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी स्टॉपवर कालीपिली चालवणाºया ड्रायवर लोकांनाही चहा पाजतो. रस्त्यानं रडत असलेल्या मुलाला खिशातील बिस्टीटपुडा देतो. असा हा ‘भला माणूस’ खरंच माणुसकी अन् माणसांसाठी आपुलीचा विषय आहे.- अ.फ. भालेराव, मुक्ताईनगर