शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

सोने-चांदीला नवी झळाली, लग्नसराई, मुहूर्त मात्र हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान ...

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान धातूंचे भावदेखील नव्या उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे यंदाचे वर्ष सोने-चांदीला नवीन झळाली देणारे ठरले. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ६ ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव थेट ५७ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच १ जानेवारी रोजी ४७ हजारांवर असलेली चांदीदेेखील ६ ऑगस्ट रोजी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ झाल्याने सोने-चांदीतील आतापर्यंतही ही उच्चांकी ठरली. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत जाऊन धनत्रयोदशीला ते ५१ हजार १०० प्रति तोळ्यावर, तर चांदी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सध्यादेखील सोने-चांदीत चढ-उतार सुरूच असून, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याचे भाव ५१ हजारांवर, तर चांदी पुन्हा ७१ हजारांवर पोहोचली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून त्या काळात सोने-चांदी वधारत गेले.

लाकॅडाऊनपूर्वीचे सोने-चांदीचे भाव पाहता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने ४४ हजारांच्या, तर चांदी ४८ हजारांच्या पुढे गेली होती.

सोने-चांदीचे भाव झाले एकसारखे

एरव्ही सोने-चांदीचे भाव कधी सारखे नसतात. मात्र यंदाच्या वर्षात तर २७ जून रोजी सोने-चांदी दोघांचेही भाव ४९ हजार ३०० रुपये होऊन दोघही धातूंचे भाव सारखेच राहिले. यात सोने प्रति किलोवर तर चांदी प्रति किलोवर होती.

व्यापारी संकुलासाठी मोठी प्रतीक्षा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना बाजारपेठ जसजशी अनलॉक होत गेली तसतसे इतर व्यवहार सुरू होत गेले. मात्र शहरातील मोठी बाजारपेठ असलेले महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यांसह विविध व्यापारी संकुल मात्र सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. यात अगोदर समविषम पद्धतीने हे संकुल सुरू झाले, मात्र पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याने व्यापारी बांधव चिंतित होते.

मुहूर्त हातचे गेले

कोरोनामुळे ऐन लग्नसराईत बाजारपेठ बंद राहिली. तसेच गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हातचे गेले. त्यामुळे या काळात सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार, मोबाइल मार्केट यांना चांगलीच झळ बसली. करोडो रुपयांचा माल भरून ठेवलेला असताना तो केवळ दुकानात पडून राहिला. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान व्यापारी बांधवांनी दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला.

नवरात्रोत्सवापासून चैतन्य

बाजारपेठ तशी नवरात्रोत्सवापासून पूर्वपदावर येऊ लागली. यात विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले व व्यापारी वर्ग सुखावला.