शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

सोने-चांदीला नवी झळाली, लग्नसराई, मुहूर्त मात्र हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान ...

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान धातूंचे भावदेखील नव्या उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे यंदाचे वर्ष सोने-चांदीला नवीन झळाली देणारे ठरले. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ६ ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव थेट ५७ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच १ जानेवारी रोजी ४७ हजारांवर असलेली चांदीदेेखील ६ ऑगस्ट रोजी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ झाल्याने सोने-चांदीतील आतापर्यंतही ही उच्चांकी ठरली. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत जाऊन धनत्रयोदशीला ते ५१ हजार १०० प्रति तोळ्यावर, तर चांदी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सध्यादेखील सोने-चांदीत चढ-उतार सुरूच असून, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याचे भाव ५१ हजारांवर, तर चांदी पुन्हा ७१ हजारांवर पोहोचली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून त्या काळात सोने-चांदी वधारत गेले.

लाकॅडाऊनपूर्वीचे सोने-चांदीचे भाव पाहता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने ४४ हजारांच्या, तर चांदी ४८ हजारांच्या पुढे गेली होती.

सोने-चांदीचे भाव झाले एकसारखे

एरव्ही सोने-चांदीचे भाव कधी सारखे नसतात. मात्र यंदाच्या वर्षात तर २७ जून रोजी सोने-चांदी दोघांचेही भाव ४९ हजार ३०० रुपये होऊन दोघही धातूंचे भाव सारखेच राहिले. यात सोने प्रति किलोवर तर चांदी प्रति किलोवर होती.

व्यापारी संकुलासाठी मोठी प्रतीक्षा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना बाजारपेठ जसजशी अनलॉक होत गेली तसतसे इतर व्यवहार सुरू होत गेले. मात्र शहरातील मोठी बाजारपेठ असलेले महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यांसह विविध व्यापारी संकुल मात्र सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. यात अगोदर समविषम पद्धतीने हे संकुल सुरू झाले, मात्र पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याने व्यापारी बांधव चिंतित होते.

मुहूर्त हातचे गेले

कोरोनामुळे ऐन लग्नसराईत बाजारपेठ बंद राहिली. तसेच गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हातचे गेले. त्यामुळे या काळात सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार, मोबाइल मार्केट यांना चांगलीच झळ बसली. करोडो रुपयांचा माल भरून ठेवलेला असताना तो केवळ दुकानात पडून राहिला. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान व्यापारी बांधवांनी दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला.

नवरात्रोत्सवापासून चैतन्य

बाजारपेठ तशी नवरात्रोत्सवापासून पूर्वपदावर येऊ लागली. यात विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले व व्यापारी वर्ग सुखावला.