शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीला नवी झळाली, लग्नसराई, मुहूर्त मात्र हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान ...

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान धातूंचे भावदेखील नव्या उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे यंदाचे वर्ष सोने-चांदीला नवीन झळाली देणारे ठरले. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ६ ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव थेट ५७ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच १ जानेवारी रोजी ४७ हजारांवर असलेली चांदीदेेखील ६ ऑगस्ट रोजी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ झाल्याने सोने-चांदीतील आतापर्यंतही ही उच्चांकी ठरली. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत जाऊन धनत्रयोदशीला ते ५१ हजार १०० प्रति तोळ्यावर, तर चांदी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सध्यादेखील सोने-चांदीत चढ-उतार सुरूच असून, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याचे भाव ५१ हजारांवर, तर चांदी पुन्हा ७१ हजारांवर पोहोचली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून त्या काळात सोने-चांदी वधारत गेले.

लाकॅडाऊनपूर्वीचे सोने-चांदीचे भाव पाहता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने ४४ हजारांच्या, तर चांदी ४८ हजारांच्या पुढे गेली होती.

सोने-चांदीचे भाव झाले एकसारखे

एरव्ही सोने-चांदीचे भाव कधी सारखे नसतात. मात्र यंदाच्या वर्षात तर २७ जून रोजी सोने-चांदी दोघांचेही भाव ४९ हजार ३०० रुपये होऊन दोघही धातूंचे भाव सारखेच राहिले. यात सोने प्रति किलोवर तर चांदी प्रति किलोवर होती.

व्यापारी संकुलासाठी मोठी प्रतीक्षा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना बाजारपेठ जसजशी अनलॉक होत गेली तसतसे इतर व्यवहार सुरू होत गेले. मात्र शहरातील मोठी बाजारपेठ असलेले महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यांसह विविध व्यापारी संकुल मात्र सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. यात अगोदर समविषम पद्धतीने हे संकुल सुरू झाले, मात्र पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याने व्यापारी बांधव चिंतित होते.

मुहूर्त हातचे गेले

कोरोनामुळे ऐन लग्नसराईत बाजारपेठ बंद राहिली. तसेच गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हातचे गेले. त्यामुळे या काळात सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार, मोबाइल मार्केट यांना चांगलीच झळ बसली. करोडो रुपयांचा माल भरून ठेवलेला असताना तो केवळ दुकानात पडून राहिला. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान व्यापारी बांधवांनी दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला.

नवरात्रोत्सवापासून चैतन्य

बाजारपेठ तशी नवरात्रोत्सवापासून पूर्वपदावर येऊ लागली. यात विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले व व्यापारी वर्ग सुखावला.