शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

सोने-चांदीला नवी झळाली, लग्नसराई, मुहूर्त मात्र हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान ...

जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान धातूंचे भावदेखील नव्या उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे यंदाचे वर्ष सोने-चांदीला नवीन झळाली देणारे ठरले. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ६ ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव थेट ५७ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच १ जानेवारी रोजी ४७ हजारांवर असलेली चांदीदेेखील ६ ऑगस्ट रोजी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ झाल्याने सोने-चांदीतील आतापर्यंतही ही उच्चांकी ठरली. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत जाऊन धनत्रयोदशीला ते ५१ हजार १०० प्रति तोळ्यावर, तर चांदी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सध्यादेखील सोने-चांदीत चढ-उतार सुरूच असून, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याचे भाव ५१ हजारांवर, तर चांदी पुन्हा ७१ हजारांवर पोहोचली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून त्या काळात सोने-चांदी वधारत गेले.

लाकॅडाऊनपूर्वीचे सोने-चांदीचे भाव पाहता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने ४४ हजारांच्या, तर चांदी ४८ हजारांच्या पुढे गेली होती.

सोने-चांदीचे भाव झाले एकसारखे

एरव्ही सोने-चांदीचे भाव कधी सारखे नसतात. मात्र यंदाच्या वर्षात तर २७ जून रोजी सोने-चांदी दोघांचेही भाव ४९ हजार ३०० रुपये होऊन दोघही धातूंचे भाव सारखेच राहिले. यात सोने प्रति किलोवर तर चांदी प्रति किलोवर होती.

व्यापारी संकुलासाठी मोठी प्रतीक्षा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना बाजारपेठ जसजशी अनलॉक होत गेली तसतसे इतर व्यवहार सुरू होत गेले. मात्र शहरातील मोठी बाजारपेठ असलेले महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यांसह विविध व्यापारी संकुल मात्र सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. यात अगोदर समविषम पद्धतीने हे संकुल सुरू झाले, मात्र पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याने व्यापारी बांधव चिंतित होते.

मुहूर्त हातचे गेले

कोरोनामुळे ऐन लग्नसराईत बाजारपेठ बंद राहिली. तसेच गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हातचे गेले. त्यामुळे या काळात सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार, मोबाइल मार्केट यांना चांगलीच झळ बसली. करोडो रुपयांचा माल भरून ठेवलेला असताना तो केवळ दुकानात पडून राहिला. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान व्यापारी बांधवांनी दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला.

नवरात्रोत्सवापासून चैतन्य

बाजारपेठ तशी नवरात्रोत्सवापासून पूर्वपदावर येऊ लागली. यात विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले व व्यापारी वर्ग सुखावला.