शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोलाणी मार्केट, दाणाबाजारात ‘वन वे’ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडी टळावी यासाठी सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेला दाणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडी टळावी यासाठी सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेला दाणा बाजार व गोलाणी मार्केट हे दोन परिसर ‘वन वे’ घोषीत करण्यात आलेले आहेत. मात्र हे ‘वन वे’ नावालाच असून वाहन धारक पोलिसांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ‘वन वे’ चे उल्लंघन करणाऱ्या वर्षभरात ४३७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गोलाणी मार्केट परिसरात सतरा मजली इमारतीकडून हनुमान मंदिराकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. हनुमान मंदिराकडून वाहने शिवाजी रोड अर्थात सतरा मजली इमारतीकडे जावू शकतात. दाणाबाजारातही सुभाष चौकाकडून प्रवेशाला बंदी आहे. पोलन पेठ तसेच कॉग्रेस भवनकडून रस्ता बंद आहे. दोन्ही ठिकाणी ‘वन वे’ चे फलक लावण्यात आले होते, मात्र आता हे फलकही गायब झालेले आहेत. शनिवारी ‘लोकमत’ ने या भागात पाहणी केली असता ‘वन वे’ चे नियम कोणत्याच वाहनधारकाकडून पाळले जात नसल्याचे दिसून आले. चारचाकी, रिक्षा व दुचाकी असे तिनही प्रकारचे वाहने या मार्गावरुन जात होती.

वाहतूक नियम गुंडाळले

वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालनच होत नसल्याचे दिसून आले. शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने दाणाबाजार व सुभाष चौकात मोठी गर्दी होती. ट्रक मात्र पोलन पेठेकडून येत होते, इतर चारचाकी व दुचाकी चालकांकडून नियमांचे पालनच होत नव्हते. गोलाणी मार्केट परिसरातही हीच अवस्था होती. येथे तर कुठलाच नियम पाळला जात नाही. या भागात देखील शनिवारी मोठी गर्दी होती. रस्त्याच्याकडेलाच दुचाकींची पार्कींग करण्यात आली होती, त्यामुळे मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता.

वाहतूक पोलीस गायब

गोलाणी मार्केट व दाणा बाजार या दोन्ही ‘वन वे’ च्या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस तैनात केले जातात. सुभाष चौकात पोलीस होते, मात्र गोलाणी मार्केट परिसरात एकही पोलीस नव्हता. या भागात कधीच पोलीस थांबत नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. दाणाबाजारात पोलीस असूनही ‘वन वे’ मधून वाहने जातच होती.

बेशिस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडी

गोलाणी मार्केट परिसरात हनुमान मंदिरापासून तर थेट सतरा मजली इमारतीपर्यंत रस्त्याच्याकडेला दुचाकी तर त्याला लागून चारचाकींची बेशिस्तपणे पार्कींग केली जाते. सुभाष चौकात तर विचारायलाच नको, तेथे पाय ठेवायला जागा नसताना मिळेल ते वाहन पार्कींग केले जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

वर्षभरात ४३७ जणांवर कारवाई

‘वन वे’ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३७ वाहनधारकांवर वर्षभरात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली. दरम्यान, या भागात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गरजेनुसार पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. सुभाष चौक व दाणा बाजारात रोज कर्मचारी असतात. गोलाणी मार्केटमध्ये रोज कर्मचारी दिले जात नाहीत. मध्यंतरी बॅरीकेटस‌् लावण्यात आले होते. दाणाबाजारात ते लावले जातात. अरुंद रस्ते, पार्कींगला जागा नसणे व त्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने हा प्रश्न सातत्याने निर्माण होतो,तरी देखील आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत असतो. वाहनधारकांनी देखील मानसिकता बदलवली पाहिजे, असे कुनगर म्हणाले.