जळगाव : कोरोनाच्या संकटात एकमेकांविषयी कोणतीही माहिती नसताना नागरिकांनी एकमेकांची मदत करीत एकमेकांना आधार दिला. याच कोरोना काळात देशात सहिष्णू भारताचेही दर्शन झाले. ही वास्तविकता ‘इंडिया इन टॉलरन्स’ या पुस्तकात सोप्या भाषेत मांडण्यात आली असल्याचा सूर सदर पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उमटला.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये तारीख शेख लिखित ‘इंडिया इन टॉलरन्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी करीम सालार होते तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन, डॉ. विकास बोरोले, आकाशवाणीच्या निवृत्त निवेदिका डॉ.उषा शर्मा,रऊफ शेख व लेखक तारीक शेख उपस्थित होते.
प्रास्ताविक लेखक तारीक शेख यांनी केले. लेखकाने पुस्तकात स्वप्नरंजन न करता तसेच मसाला न भरता प्रवाही भाषेत मांडणी केल्याचे डॉ.उषा शर्मा यांनी सांगितले. सचिन नारळे, गोविंद मंत्री, गनी मेमन, सतीश मोरे, मुख्याध्यापक हारुन बशीर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनीही मार्गदर्शन केले.
फोटो कॅप्शन - इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे प्रकाशन करताना महापौर जयश्री महाजन, करीम सालार, डॉ. विकास बोरोले, तारीक शेख, उषा शर्मा व अन्य.