शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

असोदाला वाघूरचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असोदा येथील शेतकरी वाघूरच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. तसेच आता शासनाच्या बंदिस्त पाईप लाईन करण्याच्या धोरणानुसार या पाईपलाईनसाठी निधी मिळावा, अशी मागणीदेखील या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पाटचारी कालबाह्य ठरवत धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पोहचवण्याचे धोरण स्वीकारले आहे. वाघूर प्रकल्पाच्या या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. मात्र या भागासाठी निधीची आवश्यकता असूनही तो निधी राज्य सरकारने अजून दिलेला नाही. त्यामुळे असोदा आणि भादली परिसरातील मोठे क्षेत्र या पाण्यापासून वंचित आहे. यासाठीचा प्रस्ताव चार वर्षांपासून महामंडळाने शासनाला पाठवला आहे. ९४ कोटींच्या निधीची मागणीदेखील केली आहे. तरीही अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

निवेदन देतांना किशोर चौधरी, ज्योती महाजन, शरद नारखेडे, संजय चिरमाडे, संजय ढाके, दिलीप अत्तरदे, मिलिंद चौधरी, सुधीर पाटील, बापू महाजन, संदीप नारखेडे, योगराज भोळे, जितेंद्र भोळे, राजेंद्र चौधरी, गोपाळ ढाके उपस्थित होते.