शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

असोदाला वाघूरचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असोदा येथील शेतकरी वाघूरच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. तसेच आता शासनाच्या बंदिस्त पाईप लाईन करण्याच्या धोरणानुसार या पाईपलाईनसाठी निधी मिळावा, अशी मागणीदेखील या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पाटचारी कालबाह्य ठरवत धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पोहचवण्याचे धोरण स्वीकारले आहे. वाघूर प्रकल्पाच्या या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. मात्र या भागासाठी निधीची आवश्यकता असूनही तो निधी राज्य सरकारने अजून दिलेला नाही. त्यामुळे असोदा आणि भादली परिसरातील मोठे क्षेत्र या पाण्यापासून वंचित आहे. यासाठीचा प्रस्ताव चार वर्षांपासून महामंडळाने शासनाला पाठवला आहे. ९४ कोटींच्या निधीची मागणीदेखील केली आहे. तरीही अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

निवेदन देतांना किशोर चौधरी, ज्योती महाजन, शरद नारखेडे, संजय चिरमाडे, संजय ढाके, दिलीप अत्तरदे, मिलिंद चौधरी, सुधीर पाटील, बापू महाजन, संदीप नारखेडे, योगराज भोळे, जितेंद्र भोळे, राजेंद्र चौधरी, गोपाळ ढाके उपस्थित होते.