शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी सर्जनशीलतेची संधी -सविता वायळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:12 IST

पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी द्यावी, असे आवाहन बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी केले.

ठळक मुद्देमराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांचे आवाहन आॅनलाईन संवाद सत्राच्या समारोपात शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

भुसावळ : वर्ग आणि वयानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांची भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी द्यावी, असे आवाहन बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी केले.जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित लेखक-कवींशी आॅनलाईन संवादसत्राच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.प्रारंभी बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी आॅनलाईन संवाद सत्रात पार पडलेल्या एकूण बारा लेखक-कवींसह दोन संवाद सत्र अशा १४ सत्रांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वायळ यांचा परिचय करून दिला. त्यानंतर वायळ म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे जागतिक संकट आहे. तरीसुद्धा शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा स्तुत्य उपक्रम डॉ.जगदीश पाटील यांनी राबवला. शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नसले तरी शिक्षकांनी आधीपासूनच आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू राहील यासाठी शिक्षक धडपडत आहेत. सध्या विद्यार्थी घरी असल्याने पालकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनीसुद्धा पाठ्यपुस्तके हाताळून मुलांशी चर्चा करावी आणि त्यांच्याशी संवाद साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी संकट हीच संधी समजून संकटाकडे नकारात्मक भूमिकेने न पाहता सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहनही वायळ यांनी केले. याचबरोबर त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीमागची भूमिका, पाठ्यपुस्तक निर्मिती करतानाचा अनुभव आणि पाठ्यपुस्तक हातात आल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया याविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ.माधुरी जोशी नागपूर, जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील, सुनीता गोळे मुंबई, पी.एस. पाटील जामठी, दीपक चौधरी बोदवड, मनीषा भटकर यावल यांनी मनोगत व्यक्त केले.एकूण १५ आॅनलाईन संवाद सत्र - डॉ.सुनील विभुते, डॉ.महेंद्र कदम, ज.वि. पवार, वीरा राठोड, डॉ.नीलिमा गुंडी, डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे, आसावरी काकडे, डॉ.विजया वाड, अरविंद जगताप, नीरजा, द. भा.धामणस्कर, सुप्रिया खोत, डॉ.दीपाली पूर्णपात्रे, चारूदत्त आफळे महाराज, सविता वायळ या वक्त्यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्याचा लाभ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी घेतला.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ