शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

महिनाभराचा अवधी द्या, ठेवीदारांना न्याय देऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:18 IST

जळगाव : आपल्या हातात जादूची कांडी नाही. मात्र, महिनाभराचा अवधी द्या, ठेवीदारांना नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा आशेचा किरण ...

जळगाव : आपल्या हातात जादूची कांडी नाही. मात्र, महिनाभराचा अवधी द्या, ठेवीदारांना नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा आशेचा किरण दाखवत बीएचआरचे नवनियुक्त अवसायक चैतन्य नासरे यांनी ठेवीदारांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. नासरे यांनी सोमवारी दुपारी पदभार स्वीकारला. कार्यालय सील असल्याने आधी न्यायालयाच्या माध्यमातून ते सील उघडावे लागणार आहे. त्यानंतर संस्थेच्या कारभाराची अर्थात आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल, त्यानंतर खऱ्या अर्थाने ठेवीदारांसाठी काम करता येईल, असेही नासरे म्हणाले.

बीएचआरचा अवसायक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ने नासरे यांची भेट घेतली. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे सहायक निबंधक व नागपूर येथील समता सहकारी बँकेचे अवसायक अशी दुहेरी जबाबदारी असतानाच नासरे यांच्याकडे आता बीएचआरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एखाद्या पतसंस्थेचे इतके मोठे व आलिशान कार्यालय असेल असे वाटले नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे ही एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या देशभरात २६४ शाखा असून गुंतवणुकीचा आकडाही मोठा आहे. ठेवीदारांची फसवणूक झालेली असली तरी त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी प्रथम जबाबदारी आहे, त्यासाठी मला काही दिवसाचा अवधी लागणार आहे.

ऑडिटवरच कळणार आर्थिक स्थिती

पतसंस्था किंवा बँकाची स्थिती ही ऑडिट रिपोर्टवरच कळते. या संस्थेचे शेवटचे ऑडिट कधी झाले आहे, त्याची माहिती घेणार आहे. २०१५-२०१६ यानंतर ऑडिटच झालेले नाही, असे कळले आहे. एका वर्षाचे ऑडिट करायचे असेल तर दोन वर्षे लागतील. संपूर्ण ऑडिट झाल्यावरच संस्थेच्या परिस्थितीचा अंदाज येईल, त्यानुसार मालमत्ता, ठेवीदारांच्या रकमा, कर्मचाऱ्यांचे वेतन यासह इतर बाबींचा अभ्यास करून ठेवीदारांना शंभर टक्के नाही; परंतु नक्कीच काहीना काही मदत मिळवून देईल. त्यासाठी ठेवीदारांनी तितकाच संयम ठेवावा व मला काम करण्यास वेळ द्यावा, असे आवाहनही नासरे यांनी केले आहे.

सहकारी बँकांना डीआयसीजीईअंतर्गत विमा सरंक्षण

सहकारी बँकांतील ठेवीदारांना आता डीआयसीजीई (डिपॉझिट इन्शुरन्स ॲड क्रेडिट गॅरंटी काॅर्पोरेशन) अंतर्गत पाच लाखांचे विमा सरंक्षण लागू करण्यात आले आहे. तत्कालीन मुख्य सचिव जे.पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवीदारांना विमा संरक्षण देण्याबाबत समिती गठित करण्यात आली होती. या समितीची संपूर्ण जबाबदारी नासरे यांच्यावर होती. ठेवीदारांना पाच लाखांचे संरक्षण देण्याबाबत नासरे यांनी सरकारला पटवून दिले होते, तेव्हा एक लाखाचे संरक्षण देण्यात आले होते. आता सरकारने त्याच समितीचा अहवाल मान्य करून पाच लाखांचे संरक्षण देण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. हा नियम पतसंस्थांना लागू नसल्याचे आसरे यांनी सांगितले.

--