शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘स्वेच्छानिवृत्ती’ योजनेत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेल्या महामंड‌ळाने आता वाढत्या खर्चाला कात्री लावण्यासाठी ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना ...

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेल्या महामंड‌ळाने आता वाढत्या खर्चाला कात्री लावण्यासाठी ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना आणली आहे. या योजनेनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती घेतांना मूळ वेतन व महागाई भत्त्यासह प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. मात्र, वर्षातील १२ महिन्यांपैकी फक्त तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार असल्याने,जळगाव विभागातील ५० वर्षावरील १ हजार २७१ कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४४ कर्मचाऱ्यांनीच अर्ज भरले आहेत. अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.

मात्र, अर्ज भरलेल्या ४४ कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांवर कर्जाचे ओझे तर काहींनी शारीरिक व्याधीमुळे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज भरला असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

तर ८० टक्के कामगार आजच स्वेच्छानिवृत्ती घेणार

महामंडळ प्रशासनाने स्वेच्छानिवृत्तीची योजना राबवितांना निवृत्ती घेणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील एका वारसाला महामंडळात नोकरी देण्याची मागणी या कामगारांतर्फे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे. जर स्वेच्छानिवृत्ती घेतली तर, उर्वरित आयुष्य काढण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने जर वारसाला नोकरी दिली, तर भविष्याची चिंता राहणार नाही. त्यामुळे महामंडळाने स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेत वारसांना नोकरी देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सध्या ५० वर्षांवरील कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार ५० ते ६० हजार इतके वेतन मिळते, वर्षाला एकूण ६ लाखांचे उत्पन्न मिळत असतांना, महामंडळाने फक्त तीन महिन्याचे वेतन दिल्यावर कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महामंड‌ळाने आठ महिन्यांच्या पगारासह एका वारसाला नोकरी दिल्यास ८० टक्के कामगार आजच स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याचे विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

इन्फो :

महामंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेत निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला योग्य शैक्षणिक अर्हतेनुसार महामंडळात नोकरी व तीनऐवजी आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी कामगारांनी महामंडळाकडे केली आहे. तसेच या निर्णयाच्या पाठपुराव्याबाबत अनेक कामगारांनी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना