शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीआॅन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 15:31 IST

महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

ठळक मुद्दे ‘एनएसयु’ची मागणी उमवित आंदोलन २५ रोजी ‘कॅरीआॅन’बाबत  निर्णय घेवू : उमविचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तीसºया वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसºया वर्षाच्या  एका विषयात नापास  झाल्याने विद्यार्थ्यांना  चौथ्या वर्षाला प्रवेश  घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत असल्याने एनएसयुआय कडून  हे आंदोलन करण्यात आले.  एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी उमवि परिसर ‘वुई वॉन्ट कॅरीआॅन’ च्या घोषणांनी दणाणून सोडला होता. 

नांदेड विद्यापीठाने केले तर उमविला काय अडचण ?एनएसयुआयच्या काही विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलसचिव  प्रा.ए.बी.चौधरी यांची  भेट घेतली. नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु यांनी आपल्या विशेषाधिकार वापरून विद्यापीठातील संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये  कॅरीआॅन सुरु केले असून,  उमवि प्रशासनाला काय अडचणण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी  उपस्थित केला. तसेच याबाबत अनेकवेळा उमविचे  परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली वागणुक दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच जोपर्यंत  कॅरीआॅन बाबत निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही, तोवर  विद्यापीठ सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

प्राधिकरण निवडणूक संपल्यानंतर निर्णय घेवू१७ सप्टेंबर रोजी उमविच्या प्र्राधिकरणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून, १९  सप्टेंबर रोजी  निवडणुकीचा निकाल  जाहीर होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कॅरीआॅन बाबत निर्णय शक्य नसल्याने २५ सप्टेंबर रोजी कॅरीआॅन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्र्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, उपकुलसचिव प्रा.बी.बी.पाटील, प्रा.राजेश वळवी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. २५ रोजी कॅरीआॅनबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘एनएसयुआय’तर्फे देण्यात आला आहे.