शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीआॅन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 15:31 IST

महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

ठळक मुद्दे ‘एनएसयु’ची मागणी उमवित आंदोलन २५ रोजी ‘कॅरीआॅन’बाबत  निर्णय घेवू : उमविचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तीसºया वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसºया वर्षाच्या  एका विषयात नापास  झाल्याने विद्यार्थ्यांना  चौथ्या वर्षाला प्रवेश  घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत असल्याने एनएसयुआय कडून  हे आंदोलन करण्यात आले.  एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी उमवि परिसर ‘वुई वॉन्ट कॅरीआॅन’ च्या घोषणांनी दणाणून सोडला होता. 

नांदेड विद्यापीठाने केले तर उमविला काय अडचण ?एनएसयुआयच्या काही विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलसचिव  प्रा.ए.बी.चौधरी यांची  भेट घेतली. नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु यांनी आपल्या विशेषाधिकार वापरून विद्यापीठातील संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये  कॅरीआॅन सुरु केले असून,  उमवि प्रशासनाला काय अडचणण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी  उपस्थित केला. तसेच याबाबत अनेकवेळा उमविचे  परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली वागणुक दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच जोपर्यंत  कॅरीआॅन बाबत निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही, तोवर  विद्यापीठ सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

प्राधिकरण निवडणूक संपल्यानंतर निर्णय घेवू१७ सप्टेंबर रोजी उमविच्या प्र्राधिकरणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून, १९  सप्टेंबर रोजी  निवडणुकीचा निकाल  जाहीर होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कॅरीआॅन बाबत निर्णय शक्य नसल्याने २५ सप्टेंबर रोजी कॅरीआॅन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्र्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, उपकुलसचिव प्रा.बी.बी.पाटील, प्रा.राजेश वळवी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. २५ रोजी कॅरीआॅनबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘एनएसयुआय’तर्फे देण्यात आला आहे.