शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

जिल्हा बॅँक प्रकरणात सुस्पष्ट शपथपत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:36 IST

खंडपीठाचे आदेश : तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे

जळगाव : विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालावरून जिल्हा बँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी २०१२ मध्ये जिल्हापेठ पोलिसात दिली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात आतापर्यंत नुकसानीच्या रकमेच्या वसूलीसाठी काय कार्यवाही केली? याबाबत माहिती देणारे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र ५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलावडे व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मालमत्ता जप्त झाल्या काय? अशी विचारणा करून तपासात काहीही प्रगती नसल्याबाबत तपास यंत्रणेवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.४०० कोटींचे बॅँकेचे नुकसानजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०१२ मध्ये झालेल्या विशेष लेखापरिक्षणात बॅँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. बॅँकेच्या काही सवलतीच्या योजनांमुळे हे नुकसान झाल्याचे विशेष लेखा परिक्षणातून समोर आले होते.पोलिसात तक्रारयाबाबतचा अहवाल लेखा परिक्षकाने दिल्यानंतर माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती़ त्यानुसार ४०० कोटी रूपयांमध्ये बँकेचे नुकसान झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा काही काळ तपास चालला, त्यानंतर तपास संथगतीने सुरू होता़ त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले व त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर कामकाज सुरू आहे.मालमत्तांचा तपास घेणे आवश्यकअशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातील पैसा हा अधिकतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात असतो़ त्यामुळे या प्रकरणातील तपासी अधिकारी यांनी अशा मालमत्तांचा शोध घेणे तसेच त्या जप्त करणे आवश्यक होते. त्याबाबत तपासी अधिकारी यांनी आतापर्यंत या मालमत्तांचा शोध घेतला का? तसेच त्याबाबत काय कार्यवाही केली? मालमत्ता जप्त केल्या गेल्यात काय? अशी विचारणा करून ५ एप्रिलपूर्वी स्पष्ट अभिप्राय असलेले शपथ पत्र न्यायालयात दाखल करावे, असे आदेश न्यायाधीश टी़व्ही़ नलवाडे व न्या़ मंगेश़ एस़ पाटील यांनी दिले आहेत.तपासी अधिकाऱ्यांना फटकारलेजिल्हा बँकेचे ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्या प्रकरणात संबंधित तपासणी अधिकाºयाकडून तपासात प्रगती झाली नाही़ त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे. या प्रकरणाचा योग्यरित्या व योग्य दिशेने तपास करण्याच्या सुचना देखील न्यायालयाने दिल्या आहे़गुन्ह्याच्या तपासात प्रगती नाहीबँकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी २७ मार्च रोजी आदेश दिले आहेत. या आदेशात तपासी अधिकाºयांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या गुन्ह्यातील तपासात प्रगतीच झालेली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे़ त्यामुळे योग्य दिशेने तपास व्हावा, अशा सुचना न्यायालयाने तपासी अधिकाºयांना केल्या आहेत़