शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सीमेवरील जवानांसाठी मुक्ताईनगरातून विद्यार्थिनींनी पाठविल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:43 IST

आपल्या देशाच्या सीमेवर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या जवांनाना बहिणीच्या मायेचा ओलावा लाभावा म्हणून मुक्ताईनगरातील जे.ई. स्कूलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या ९५ विद्यार्थिनीनी ‘बंध रेशमाचे’ या उपक्रमांतर्गत राख्या पाठविल्या आहेत. सोबत या जवानांसाठी शुभेच्छा पत्र देखील रवाना केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिंनींचे शहरवासियांकडून कौतुक शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेतून साकारला उपक्रम

मुक्ताईनगर, जि. जळगाव : जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यर्थिनींनी ‘ बंध रेशमाचे, राखी सैनिको के नाम’ या उपक्रमातून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात सैनिकांसाठी ९५ विद्यर्थिनींनी राख्या व हस्तलिखित शुभेच्छा पत्र पाठविले आहेत. या उपक्रमाद्वारे सैनिक बांधवांना राखीची भेट पाठविण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये अपूर्व असा उत्साह होता.राखीपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येतेच. पण अनेकांना कामामुळे बहिणीला भेटता येत नाही. अशावेळी व्हिडीओ कॉल, फोन, मेसेजच्या माध्यमातून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र सैनिकांना प्रत्येकवेळी बहिणीशी बोलणे शक्य होतेच असं नाही. सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधण्यासाठी येणे शक्य होत नाही. सैन्यातील भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, आणि देशसेवेसाठी सीमेवर असलेल्या सैनिक बांधवांना राखी व शुभेच्छा पत्रातून स्फूर्ती आणि बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा. त्यांचा हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता नववी व दहावीच्या तब्बल ९५ विद्यार्थिनींनी राखी आणि स्वत:च्या हाताने लिहिलेले शुभेच्छा पत्र सैनिकांसाठी पाठविले. विद्यार्थिनींनी सैनिक भावांसाठी पाठवलेली ही भेट प्रथम अठरा महाराष्ट्र बटालियन यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तेथून ही राखी पौर्णिमेची भेट सीमेवरती थेट सैनिकांना पाठवली जाणार आहे. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक केले जात आहे. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन