शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

गिरीश महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहराची वाट लावली असून, आता शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याकडून केवळ आरोप व टीका केली जात आहे. पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. ते निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

निधी वाटपात भाजपसारखा भेदभाव केला नाही

जळगाव शहर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीबाबतची माहिती देण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असून, आम्ही विकासाचे राजकारण करतो केवळ वल्गना करत नाही. तसेच जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यातमध्येदेखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन हे निधी वाटपाचा वेळेस देखील केवळ भाजपचाच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली?

जलसंपदा मंत्री असताना पाच तालुके अवलंबून असलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी एक दमडी गिरीश महाजन यांनी दिली नाही, बलून बंधाऱ्याची घोषणा केवळ एखादा फुग्याप्रमाणे आहे. गिरीश महाजन यांनी केवळ संकट मोचक असा कार्यक्रम वाजवून घेतला, केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले. जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शहरासाठी केवळ घोषणा केला मात्र त्यात शहराकडे अडीच वर्षे ढुंकूनदेखील पाहिले नाही.

भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच बंगालमध्ये पराभव

भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.