शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

गिरीश महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहराची वाट लावली असून, आता शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याकडून केवळ आरोप व टीका केली जात आहे. पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. ते निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

निधी वाटपात भाजपसारखा भेदभाव केला नाही

जळगाव शहर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीबाबतची माहिती देण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असून, आम्ही विकासाचे राजकारण करतो केवळ वल्गना करत नाही. तसेच जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यातमध्येदेखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन हे निधी वाटपाचा वेळेस देखील केवळ भाजपचाच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली?

जलसंपदा मंत्री असताना पाच तालुके अवलंबून असलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी एक दमडी गिरीश महाजन यांनी दिली नाही, बलून बंधाऱ्याची घोषणा केवळ एखादा फुग्याप्रमाणे आहे. गिरीश महाजन यांनी केवळ संकट मोचक असा कार्यक्रम वाजवून घेतला, केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले. जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शहरासाठी केवळ घोषणा केला मात्र त्यात शहराकडे अडीच वर्षे ढुंकूनदेखील पाहिले नाही.

भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच बंगालमध्ये पराभव

भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.