शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गिरीश महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहराची वाट लावली असून, आता शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याकडून केवळ आरोप व टीका केली जात आहे. पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. ते निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

निधी वाटपात भाजपसारखा भेदभाव केला नाही

जळगाव शहर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीबाबतची माहिती देण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असून, आम्ही विकासाचे राजकारण करतो केवळ वल्गना करत नाही. तसेच जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यातमध्येदेखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन हे निधी वाटपाचा वेळेस देखील केवळ भाजपचाच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली?

जलसंपदा मंत्री असताना पाच तालुके अवलंबून असलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी एक दमडी गिरीश महाजन यांनी दिली नाही, बलून बंधाऱ्याची घोषणा केवळ एखादा फुग्याप्रमाणे आहे. गिरीश महाजन यांनी केवळ संकट मोचक असा कार्यक्रम वाजवून घेतला, केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले. जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शहरासाठी केवळ घोषणा केला मात्र त्यात शहराकडे अडीच वर्षे ढुंकूनदेखील पाहिले नाही.

भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच बंगालमध्ये पराभव

भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.