शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

प्रतिटन ५०० रुपये ऊसतोड मजूरी मिळावी : चाळीसगावी पत्रपरिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:06 IST

कोरोनाकाळात ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून गेल्या अनेक वर्षात त्यांच्या मजूरीतही वाढ झालेली नाही.

ठळक मुद्देएकही मजूर पश्चिम महाराष्ट्रात जाऊ देणार नाहीउसतोड मुकादम, कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किशोर पाटील ढोमणेकर यांचा इशारासंपूर्ण राज्यात १४ लाख ऊसतोड मजूरराज्य सरकारला ७ आॅक्टोबरपर्यंत अल्टीमेटमतीव्र आंदोलनही करणारउत्तर महाराष्ट्रात चार लाख ऊसतोड मजूरकोरोनाकाळात ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जिजाबराव वाघचाळीसगाव,जि.जळगाव : कोरोनाकाळात ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून गेल्या अनेक वर्षात त्यांच्या मजूरीतही वाढ झालेली नाही. प्रतिटन ५०० रुपये ऊसतोड मजुरी मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्य सरकारला ७ आॅक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला असून यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील एकही ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात जाऊ देणार नाही, असा इशारा ऊसतोड मजूर व मुकादम संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व मुकादम किशोर पाटील ढोमणेकर यांनी रविवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.गेल्या वर्षीदेखील कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लाखो ऊसतोड मजुरांची फरफट झाली. काहींना साखर कारखान्यांच्या परिसरात अडकून रहावे लागले. गावी परत येणा-या मजुरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यावर्षी १५ पासून राज्यातील ऊस गळीत हंगामाचा बिगूल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचेही किशोर पाटील ढोमणेकर यांनी सांगितले.ऊसतोड मजुरांची परिस्थिती खालावली आहे. त्यांना सद्य:स्थितीत २४० रुपये प्रतिटन ऊसतोड मजुरी मिळते. यासाठी त्यांचे पूर्ण कुटुंब दिवसभर राबते. वाढलेली महागाई पाहता हे दर ५०० रुपये प्रतिटन देण्यात यावे. याबरोबरच कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागण्या असल्याचेही त्यांनी सांगितले.संपूर्ण राज्यात १४ लाख ऊसतोड मजूर आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मजुरांची संख्या चार लाख आहे. चाळीसगाव, पारोळा येथूनही मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर राज्यभर व परराज्यातही ऊसतोडीसाठी जातात. यंदा ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून कारखाने चार महिन्यांपेक्षा जास्त चालतील. अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरीत वाढ करणे गरजेचे आहे.मागण्यांबाबत राज्य शासनाला सात पर्यंत मुदत दिली आहे. ऊसतोड कामगार व मुकादम संघटनेच्या रास्त मागण्यांचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरू. उत्तर महाराष्ट्रातील एकही मजूर ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही पाटील यांनी मांडली.

टॅग्स :LabourकामगारChalisgaonचाळीसगाव