शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सावट इथले दूर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:54 IST

नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम

विजयकुमार सैतवालजळगाव : देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी नोटाबंदीचा घेण्यात आलेला निर्णय सर्वच क्षेत्राच्या मुळावर आल्याने दोन वर्षानंतरही त्याचे सावट दूर झालेले नाही. जळगावातील सुवर्ण व्यवसाय असो की पाईप उद्योग यांना याचा मोठा फटका बसला. जळगावातील महत्त्वाचा उद्योग असलेल्या पाईप उद्योगावरील सावट अद्यापही दूर झालेले नाही तर दुसरीकडे स्वॅपच्या भुर्दंडाने ग्राहक त्रस्त आहेत.देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली. देशाच्या विकासासाठी नागरिकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करीत पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. ५० दिवसानंतर स्थिती पूर्वपदावर येईल, नागरिकांचे हाल थांबतील, बँकांमध्ये चलन वाढेल, कॅशलेससाठी स्वॅपचा मोठा वापर वाढेल, अशी आशा होती. स्वॅपचा वापर वाढला मात्र त्याचा भूर्दंड ग्राहक अथवा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. इतकेच उद्योग, व्यापार क्षेत्रावर नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम आहे. सुवर्ण व्यवसाय यातून सावरला असला तरी वर्षभर व्यवसायावर झालेले परिणाम न विसरण्यासारख्या असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात गुंतवणूकदेखील कमी झाली आहे.जुन्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सर्वच व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला. यातून ५०० वस्तूंची मुख्य बाजारपेठ असलेल्या जळगावातील दाणाबाजारालाही याच्या मोठ्या झळा सोसाव्या लागल्या. नोटाबंदीतून कॅशलेस व्यवहार वाढावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला तरी जळगावात बाजारपेठेत वर्षभरानंतरही असे चित्र नव्हते. आताही कॅशलेससाठी शुल्क आकारले जात असल्याने जनता यापासून लांबच आहे. नोटाबंदीनंतर पहिले आठ दिवस तर दाणाबाजारात शुकशुकाट होता. ‘कॅशलेस’ व्यवहाराची चर्चा असली तरी ग्रामीण भागात अद्यापही या व्यवहाराबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे. हे नागरिक स्वॅपद्वारे व्यवहार करण्यास धजावत नाही. इतकेच काय धनादेश देण्यासही ते तयार नाही. स्वॅप करताना शुल्क लागत असल्याने व्यापारी व ग्राहकांना झळ बसते. त्यामुळे हे शुल्क रद्द करण्याची मागणी आहे. मात्र दोन वर्षानंतरही तसे झालेले नाही. त्यामुळे कॅशलेसचा उद्देश साध्य होऊ शकलेला नसल्याचे सांगितले जात आहे.नोटाबंदीनंतर सुवर्ण व्यवसायाला लागलेली घरघर विविध कारणांनी वर्षभर कायम होती. हे एक वर्ष सुवर्ण व्यवसायासाठी कटू आठवणी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्या नोटा बँकेत जमा झाल्याने नागरिकांच्या हाती पैसा नव्हता. त्यामुळे सुवर्ण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे ‘सुवर्णनगरी’ अशी ओळख असलेल्या जळगावातील या बाजारात पहिले तीन महिने सामसूम होती. त्यानंतर थोडीफार उलाढाल सुरू झाली, तीदेखील लग्न सराईच्या खरेदीमुळे.पाईप उद्योग यातून सावरत असला तरी त्याच्यावर अप्रत्यक्ष परिणाम असल्याचे पाईप उद्योगजकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात मागणी घटल्याने घरांसाठी लागणाºया पाईपचीही विक्री कमी झाली असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे कापड व्यवसायावरील परिणाम अजूनही कायम आहे. नोटाबंदीनंतर या व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला व त्याच्या झळा अजूनही कायम आहे.