शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

गाळेधारकांच्या प्रस्तावावर अखेर महासभेत होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

सत्तांतरानंतर प्रशासनाचा प्रस्ताव अखेर महासभेत होणार सादर : भाजपने थांबवला होता प्रस्ताव ; शिवसेना मंजुरी देईल का ? लोकमत ...

सत्तांतरानंतर प्रशासनाचा प्रस्ताव अखेर महासभेत होणार सादर : भाजपने थांबवला होता प्रस्ताव ; शिवसेना मंजुरी देईल का ?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न आता निकाली काढण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती. मात्र, तीन महिन्यात एकाही गाळेधारकाने ही रक्कम न भरल्याने आता मनपाकडून थेट गाळे लिलाव करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तत्कालीन सत्ताधारी भाजपने महासभेत सादर होऊ दिला नव्हता. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच महासभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात देखील दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय देत, गाळेधारकांकडे असलेले थकीत भाडे वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्यावर्षी मनपा प्रशासनाने काही गाळेधारकांकडून ८५ कोटींची वसुली केली होती. ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली आहे. अशा गाळेधारकांचे गाळे नूतनीकरण करून देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात होती. मात्र, हे नियमात नसल्याचे सांगत आता प्रशासनाने थकीत भाडे भरणाऱ्या १२६ गाळेधारकांसोबत इतर मार्केटमधील गाळेधारकांचे गाळे आता लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने वेळोवेळी मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या मात्र गाळेधारकांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली. दरम्यान महापालिका प्रशासन गाळेधारकांबाबत अंतिम धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आग्रही असून, १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत अखेर मनपा प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर प्रस्तावाचे भविष्य अवलंबून

मार्च महिन्यात झालेल्या राजकीय बदलानंतर महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली आहे. गाळेधारकांच्या प्रश्नावर भाजपाची भूमिका ही गाळेधारकांच्या बाजूनेच होती. तसेच हा मुद्दा राजकीय केल्याने यावर कोणताही तोडगा न काढता हा मुद्दा कायम भिजत ठेवण्याची ही भूमिका भाजपची होती. यामुळे गाळेधारकांवर कारवाईची टांगती तलवार देखील कायम होती तसेच महापालिकेचे देखील आर्थिक नुकसान कायम होत होते. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच महासभेत मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव महासभेत सादर होणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी शिवसेनेची नेमकी काय भूमिका राहील यावर या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेनेने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेधारकांच्या प्रश्न मार्गी लागू शकतो.

गाळेधारकांचा मात्र विरोध कायम

मनपा प्रशासनाकडून सादर झालेल्या प्रस्तावाबाबत शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा विरोध कायम आहे. महापालिकेने जरी गाळे भाड्यावर मूल्यांकन करून काही किंमत कमी केली असली तरी जप्ती व लिलावाची प्रक्रिया ही अटळ असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनपाच्या प्रस्तावाला गाळेधारकांकडून विरोध कायम आहे. तसेच शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या महिनाभरापासून बेमुदत संप पुकारला आहे. हा संप अजूनही कायम असून, १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत नंतर गाळेधारकांची पुढील भूमिका निश्चित होणार आहे.

नूतनीकरण होणे कठीण

मनपातील भाजपचे व भाजपचे बंडखोर नगरसेवक गाळे नूतनीकरणासाठी आग्रही होते. मात्र, सद्य स्थितीत असलेले अनेक गाळेधारक हे पोटभाडेकरु असून, अनेकांनी लिलावानुसार गाळे भाड्यात घेतलेले नाहीत. त्यातच न्यायालयाचा निर्णय, अशा अनेक कायदेशीर बाबींमुळे गाळ्यांचे नूतनीकरण होणे कठीण आहे. मनपाने १३ गाळे काही वर्षांपूर्वी सील केले होते. याच गाळ्यांचा लिलाव पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.