शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘करिअर कट्ट्या’तून ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST

जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान ...

जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन मिळावे आणि प्रशासन, उद्योगात मराठी माणसाचा टक्का वाढावा या उद्देशाने खान्देशातील महाविद्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यापासून ‘करिअर कट्ट्या’ची स्थापना करण्यात आली आहे. या करिअर कट्ट्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग खान्देशात राबविला जात आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तसेच नवोदय शैक्षणिक संस्थेचे उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयकांची सहविचार सभा पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. ए.पी. खैरनार, वाय़.व्ही. पाटील, संजयकुमार बारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती

करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती होणार आहे, असे मार्गदर्शन करताना संतोष चव्हाण यांनी सांगितले, तर विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन देण्यासाठी करिअर कट्ट्याची स्थापना झाली असल्याचे मत यशवंत शितोळे यांनी मांडले. याचा यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम मोरे, आय़.यू. शेख, डॉ. जगदीश पाटील, डॉ. योगेश कोरडे, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, डॉ. अरुणा नेरे, डॉ. वंदना पाटील यांनी परिश्रम घेतले.

असे आहेत जिल्हा समन्वयक

‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे फेब्रुवारी महिन्यात उद्घाटन झाले़ प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून उपक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक महाविद्यालयात या कट्ट्याची स्थापना करण्यात आली असून, दिवसातून दोन तास मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. सचिन नांद्रे यांची, तर नंदुरबार जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. किरण मराठे व जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. विजय तुंटे यांचा समावेश आहे.

४०० विद्यार्थ्यांची होणार निवड

या उपक्रमांतर्गत ‘उद्योजग व आयएएस आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम घेतला जात आहे. त्यात विविध क्षेत्रांतील उद्योजक व आयएएस अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे, चारशे विद्यार्थ्यांची निवड ही या उपक्रमातून केली जाईल. या चारशे विद्यार्थ्यांना दिल्लीतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.