शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब हटविण्यासाठीचा निधी अजूनही मंजुरीच्या फेऱ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता विभागीय आयुक्तांकडे पाठविला प्रस्ताव : कामही रखडले लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर ...

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता विभागीय आयुक्तांकडे पाठविला प्रस्ताव : कामही रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा कामाला अजूनही मुहूर्त लागलेला दिसून येत नाही. महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटींतील शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. या निधीला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरदेखील अद्याप विविध विभागाच्या मंजुरीच्या फेऱ्यात हा निधी अडकलेला दिसून येत आहे. आता मनपाकडून विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही या पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे शिवाजीनगरातील नागरिक अक्षरश: वैतागले असून, या पुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत, तर दुसरीकडे या पुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांबाचे स्थलांतर करण्याशिवाय या पुलाचे काम केले जाणार नाही, तर दुसरीकडे या खांबाच्या स्थलांतरासाठी प्राप्त निधीची अजूनही या विभागाकडून त्या विभागाकडे मंजुरीसाठी टोलवा-टोलवी सुरूच आहे.

विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतरच निधी होणार वर्ग

अनेक वर्षांपासून केवळ मंजुरीच्या फेऱ्यात अडकलेल्या २५ कोटींतील शिल्लक निधीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. राज्य शासनाने नुकतीच ४ कोटी १६ लाख रुपये निधीतून खांब शिफ्टिंगसह सात कामांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी बचत झालेल्या रकमेतून कामांना मंजुरी देण्यास विभागीय आयुक्तांनी नकार दिला होता. त्यामुळे या कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाच्या मान्यतेमुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी सात कामांचा प्रस्ताव पुन्हा विभागीय आयुक्तांकडे छाननीसाठी पाठविला आहे. छाननीनंतर विभागीय आयुक्त या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची शिफारस करतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ४ कोटी १६ लाख रुपयांतून होणाऱ्या सात कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करतील. दरम्यान, छाननीसाठी प्रस्ताव रवाना झाला असून, विभागीय आयुक्त किती दिवसांत निर्णय घेतात यावर पुलाचे पुढील काम ठरणार आहे. विभागीय आयुक्तांकडून मंजुरीनंतरच हा निधी महावितरणकडे वर्ग करता येणार आहे.