शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नर्मदा व तापीच्या पाण्याचा पुरेपूर वापर : मुख्यमंत्री

By admin | Updated: October 24, 2015 00:26 IST

नंदुरबार : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा वापर करून जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली

नंदुरबार : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करून येत्या काळात जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती देऊन जलयुक्त शिवारातील कामे दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्नही गंभीर असल्याने जिल्ह्यातील रिक्त पदांवर चर्चा झाली. ही पदे लवकरच भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. इतर प्रश्नांबाबत आपण नोव्हेंबर महिन्यात पुन्हा जिल्हा दौ:यावर येणार असून त्या वेळी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीतही जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार जयकुमार रावल, आमदार शिरीष चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते.

धुळे कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांनी

मुख्यमंत्र्यांची गाडी अडविली

शिरपूर : कापसाला 7 हजार रुपये भाव द्यावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना शिरपूर विमानतळावर देण्यास आडकाठी झाल्याने धुळे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी नंदुरबारकडे जाणारा मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवून महामार्गावर त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हे निवेदन स्वीकारले. शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरू करण्यासंदर्भात तालुका भाजपातर्फे, तर कापसाला भाव द्या या मागणीसाठी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. शिरपूर तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर यांच्यासह जिल्हाध्यक्ष बबन चौधरी व सहका:यांनी निवेदन दिल़े