शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकदम मस्त; पाच लाखाच्या विम्यासह उपचारही फ्री!

By अमित महाबळ | Updated: September 16, 2023 15:32 IST

जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमित महाबळ, जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. या कार्डमुळे लाभार्थींना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली. ते शनिवारी, जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आयुष्मान भव मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत आहे. यामध्ये आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा आणि अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी होणार आहे. आयुष्यमान भारतचे २१, ८४, ८३९ कार्ड देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ४, ९१, ६७४ कार्ड काढण्यात आले आहेत. आभा कार्डसाठी ४२, २९, ००० उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२, २०, ००० कार्ड काढून झाले आहेत. हे कार्ड काढून देण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी येणार आहेत. लाभार्थींनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अंकित यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते.

मोहिमेत हेही कार्यक्रम

- मोहिमेत रक्तदान व अवयवदान शिबिर, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगनिदान, तसेच कान, नाक, घसा व नेत्र तपासणी होईल. २ ऑक्टोबर रोजी, गावांमध्ये आयुष्मान सभांचे होतील.- गरोदर मातांसह शून्य ते १८ वयोगटातील ९,८८,१६३ बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकता असलेल्या बालकांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डेंग्यूवर वेळीच उपचार करा

तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यूसदृश्य आजारामुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाने गावात तपासणी केली असता, ६६ घरे आणि ९५ कंटेनरमध्ये डासअळी आढळून आली. ६ रुग्णांना ताप होता. अतितीव्र ताप असलेल्या ५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. डेंग्यूमध्ये वेळीच उपचार घेतल्यास पुढील धोके टळतील, असे आवाहन अंकित यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत कार्ड असे मिळवा

पात्रता : आयुष्यमान भारत कार्डसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहून पात्रता निश्चित केलेली आहे. यात पक्के घर नसणे, महिला प्रमुख असलेले कुटुंब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, बीपीएल कार्ड किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंब, सरकारने राबवलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ न घेतलेले कुटुंब आदी निकष आहेत.

सुविधा : केंद्र सरकार लाभार्थी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणार आहे. यामुळे कोणताही गरीब व्यक्ती खासगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकतो.

टॅग्स :Medicalवैद्यकीय