शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

एकदम मस्त; पाच लाखाच्या विम्यासह उपचारही फ्री!

By अमित महाबळ | Updated: September 16, 2023 15:32 IST

जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमित महाबळ, जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. या कार्डमुळे लाभार्थींना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली. ते शनिवारी, जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आयुष्मान भव मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत आहे. यामध्ये आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा आणि अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी होणार आहे. आयुष्यमान भारतचे २१, ८४, ८३९ कार्ड देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ४, ९१, ६७४ कार्ड काढण्यात आले आहेत. आभा कार्डसाठी ४२, २९, ००० उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२, २०, ००० कार्ड काढून झाले आहेत. हे कार्ड काढून देण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी येणार आहेत. लाभार्थींनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अंकित यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते.

मोहिमेत हेही कार्यक्रम

- मोहिमेत रक्तदान व अवयवदान शिबिर, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगनिदान, तसेच कान, नाक, घसा व नेत्र तपासणी होईल. २ ऑक्टोबर रोजी, गावांमध्ये आयुष्मान सभांचे होतील.- गरोदर मातांसह शून्य ते १८ वयोगटातील ९,८८,१६३ बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकता असलेल्या बालकांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डेंग्यूवर वेळीच उपचार करा

तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यूसदृश्य आजारामुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाने गावात तपासणी केली असता, ६६ घरे आणि ९५ कंटेनरमध्ये डासअळी आढळून आली. ६ रुग्णांना ताप होता. अतितीव्र ताप असलेल्या ५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. डेंग्यूमध्ये वेळीच उपचार घेतल्यास पुढील धोके टळतील, असे आवाहन अंकित यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत कार्ड असे मिळवा

पात्रता : आयुष्यमान भारत कार्डसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहून पात्रता निश्चित केलेली आहे. यात पक्के घर नसणे, महिला प्रमुख असलेले कुटुंब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, बीपीएल कार्ड किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंब, सरकारने राबवलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ न घेतलेले कुटुंब आदी निकष आहेत.

सुविधा : केंद्र सरकार लाभार्थी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणार आहे. यामुळे कोणताही गरीब व्यक्ती खासगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकतो.

टॅग्स :Medicalवैद्यकीय