शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

निर्बंधाचे नाव बदलून व्यापाऱ्यांची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. नेमके काय सुरू राहील आणि काय बंद राहणार याविषयी सोमवारी सकाळपासून जळगावातील व्यापार क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या तसेच लॉकडाऊनच्या विचाराने सर्वच चिंतित झाले. राज्य सरकारने आता या निर्बंधांना लॉकडाऊन न म्हणता ब्रेक द चैन असे नाव देत फसगत करीत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

गेल्यावर्षी कोरोना संसर्गामुळे ओढावलेल्या लॉकडाउन मधून सावरत नाही तोच आता पुन्हा राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी नवीन आदेश जारी केले. मात्र या आदेशात स्पष्टता नसल्याने सकाळपासूनच व्यापारी संभ्रमात होते. शनिवार-रविवार पूर्ण व्यवसाय राहणार असे राज्य सरकारने म्हटले असून इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकार लॉकडाऊन असे म्हणत नसले तरी या आदेशानुसार ८० टक्के व्यवहार बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने लॉकडाऊन असा उल्लेख न करता ब्रेक द चैन असे नवीन नाव देऊन व्यापाऱ्यांची फसगत केली असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

राज्य सरकारचे हे आदेश गेल्या वर्षांपेक्षा कठीण असून आता २५ दिवस व्यवहार बंद ठेवायचे म्हणजे व्यावसायिकांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी कसे जगावे असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारच्या या निर्णयाने व्यापारीवर्ग नष्ट होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

--_-----------

राज्य सरकारने काढलेले आदेश संभ्रमात टाकणारे असून काय सुरू राहील, काय बंद राहणार याविषयी स्पष्टता नाही.

- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

आता लॉकडाऊन केल्यास व्यावसायिकांसह आमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींनी कसे जगावे, असा प्रश्न निर्माण होतो. या विषयी सरकारने विचार करून निर्णय घ्यावा.

- रिकेश गांधी, व्यावसायिक

राज्य सरकारने काढलेल्या आदेशात कोठेही स्पष्टता नसल्याने हॉटेल सुरू ठेवावे की नाही हे समजत नाही. शनिवार, रविवार संपूर्ण बंद राहणार असेल तर पार्सल सुविधांचे काय याविषयी स्पष्टता नाही.

- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव हाॅटेल असोसिएशन

गेल्या वर्षाच्या लॉकडाउन मधून आता सावरत असताना आता पुन्हा राज्य सरकारने काढलेल्या आदेशाने चिंता वाढली आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत असून सरकारने अर्थचक्र विषयी विचार करावा.

- ललित पाटील, अध्यक्ष, जळगाव जिल्हा वाइन असोसिएशन.