शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:18 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

ठळक मुद्देदुसºया टप्प्याचे केवळ गाजरच

जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्यात येणार असून,यासाठी ६२ कोटी रुपयांची निविदा देखील काढण्यात आली आहे. मात्र, शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्यामुळे आता समांतर रस्त्यांची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर समांतर रस्ते अशक्यच असल्याची धक्कादायक माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ शी खासगीत बोलताना दिली.त्यामुळे सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून समांतर रस्त्यांबाबत देण्यात येणारे आश्वासन केवळ पोकळ असल्याचीही माहिंती अधिकाºयांनी दिली आहे. समांतर रस्त्याच्या मागणीसाठी संमातर रस्ते कृती समिती व नागरिकांकडून दबाव असल्याने शहरातील महामार्गाच्या चौपदीकरणानंतर समांतर रस्त्यांचे काम केले जाणार असल्याचे खोटे आश्वासन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत असल्याचीही माहिती या अधिकाºयांनी दिली आहे.पाईपलाईन स्थलांतराच्या सूचना नाहीसमांतर रस्त्यांचे काम करण्याचा विचार प्रशासनाचा राहिला असता तर मनपाला समांतर रस्त्यांच्या कामासाठी अडचणीची ठरणारी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार होती. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत मनपाला हे काम १५ दिवसांच्या आतच करावे लागणार होते. मात्र, या बैठकीला दोन महिने होवून देखील हे काम झालेले नाही. याबाबत मनपाचे शहर अभियंता डी.एस.खडके यांना विचारले असता, याबाबत ‘नही’ कडून कोणतेही पत्र मनपाला मिळालेले नाही, चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईनचा अडथळा ठरत नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.समांतर रस्ते न होण्यामागचे कारण1 ६२ कोटी रुपयांमधून राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शहरात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरून होणारी बरीचशी वाहतूक नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे समांतर रस्ते तयार करण्याची आवश्यकता नसल्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.2 वर्षभरातच शहराबाहेरून बायपासचे काम होणार आहे. त्यामुळे शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया वाहतुकीची वर्दळ ६० टक्कयांनी कमी होणार आहे. त्यातच शहरातील महामार्गाचे चौपदीकरण झाल्यास महामार्गावर सध्याचा घडीला निर्माण होणरी वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच समांतर रस्त्यांचे काम केले जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.चौपदरीकरणासाठी निविदेला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढचौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात होणाºया कामासाठी ६२ कोटी रुपयांची निविदेला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता १० फेब्रुवारीपर्यंत या निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिंती ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.