शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

औरंगाबाद रस्त्याचे अजिंठा चौफुलीपासून ६ किमीपर्यंत लवकरच चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:45 IST

पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना दिलेल्या सूचनेनंतर हालचालींना गती

ठळक मुद्देमक्तेदाराकडून नेरी येथे कार्यालय उभारण्यास सुरूवातअजिंठा चौफुलीवर सातत्याने अपघात होत असल्याने तातडीने सुरूवात करण्याची मागणीउपलब्ध जागेतूनच होणार चौपदरीकरण

जळगाव: जळगाव ते औरंगाबाद रस्त्याच्या रूंदी वाढीच्या कामाच्या उद्घाटनातच चौपदरीकरणाची घोषणा केल्यानंतर मागील महिन्यातच या चौपदरीकरणासही शासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान आधीच्या कामातही जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अजिंठा चौफुलीपासून सुमारे ६ किमीपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यास मंजुरी असल्याने या कामास लवकरच सुरूवात होणार आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, दि.४ रोजी याबाबत औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना दिल्यानंतर यासंदर्भातील हालचालींना गती आली आहे.जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूकीचा असल्याने  राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्यात दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले. तसेच चौपदरीकरणास जास्त खर्च येत असल्याने या रस्त्याच्या दुहेरीकरणास म्हणजेच रूंदीवाढीच्या कामासही मंजुरी देण्यात आली होती. मधला डांबरी रस्त्याची रूंदी वाढवून ७ मीटर करणे व त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दीड-दीड मीटरची रूंदी वाढवून रस्ता १० मीटर रूंद करण्याचे प्रस्तावित होते. त्या कामास मंजुरीही मिळाली. मात्र  रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. या कामाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सिल्लोड येथे दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांनी या विषयाची माहिती घेऊन उपलब्ध जागेतूनच चौपदरीकरण करण्यात यावे असा आदेश केला होता. त्यानुसार ऋतविक इन्फ्रास्ट्रक्चर हैद्राबात या मक्तेदारास कामाबाबत आदेशही देण्यात आले

अंिजंठा चौफुलीपासून लवकरच चौपदरीकरणास प्रारंभजळगावातील अजिंठा चौफुलीपासून औरंगाबादपर्यंतच्या या रस्त्यापैकी पहिल्या निविदेनुसार अजिंठा चौफुलीपासून सुरूवातीला शहरातील ६ किमीचा रस्ता चौपदरीकरणास मंजुरी होती. तर त्यापुढील रस्त्याच्या दुहेरीकरणास मंजुरी होती. आता संपूर्ण रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मक्तेदाराने नेरी येथे कार्यालय उभारण्यास सुरूवातही केली आहे. दरम्यान जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर सातत्याने अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण अजिंठा चौफुलीपासून तातडीने सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी मागणी केली होती. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार डीपीडीसीची बैठक आटोपल्यावर पालकमंत्र्यांनी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना केली. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.