शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद रस्त्याचे अजिंठा चौफुलीपासून ६ किमीपर्यंत लवकरच चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:45 IST

पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना दिलेल्या सूचनेनंतर हालचालींना गती

ठळक मुद्देमक्तेदाराकडून नेरी येथे कार्यालय उभारण्यास सुरूवातअजिंठा चौफुलीवर सातत्याने अपघात होत असल्याने तातडीने सुरूवात करण्याची मागणीउपलब्ध जागेतूनच होणार चौपदरीकरण

जळगाव: जळगाव ते औरंगाबाद रस्त्याच्या रूंदी वाढीच्या कामाच्या उद्घाटनातच चौपदरीकरणाची घोषणा केल्यानंतर मागील महिन्यातच या चौपदरीकरणासही शासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान आधीच्या कामातही जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अजिंठा चौफुलीपासून सुमारे ६ किमीपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यास मंजुरी असल्याने या कामास लवकरच सुरूवात होणार आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, दि.४ रोजी याबाबत औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना दिल्यानंतर यासंदर्भातील हालचालींना गती आली आहे.जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूकीचा असल्याने  राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्यात दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले. तसेच चौपदरीकरणास जास्त खर्च येत असल्याने या रस्त्याच्या दुहेरीकरणास म्हणजेच रूंदीवाढीच्या कामासही मंजुरी देण्यात आली होती. मधला डांबरी रस्त्याची रूंदी वाढवून ७ मीटर करणे व त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दीड-दीड मीटरची रूंदी वाढवून रस्ता १० मीटर रूंद करण्याचे प्रस्तावित होते. त्या कामास मंजुरीही मिळाली. मात्र  रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. या कामाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सिल्लोड येथे दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांनी या विषयाची माहिती घेऊन उपलब्ध जागेतूनच चौपदरीकरण करण्यात यावे असा आदेश केला होता. त्यानुसार ऋतविक इन्फ्रास्ट्रक्चर हैद्राबात या मक्तेदारास कामाबाबत आदेशही देण्यात आले

अंिजंठा चौफुलीपासून लवकरच चौपदरीकरणास प्रारंभजळगावातील अजिंठा चौफुलीपासून औरंगाबादपर्यंतच्या या रस्त्यापैकी पहिल्या निविदेनुसार अजिंठा चौफुलीपासून सुरूवातीला शहरातील ६ किमीचा रस्ता चौपदरीकरणास मंजुरी होती. तर त्यापुढील रस्त्याच्या दुहेरीकरणास मंजुरी होती. आता संपूर्ण रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मक्तेदाराने नेरी येथे कार्यालय उभारण्यास सुरूवातही केली आहे. दरम्यान जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर सातत्याने अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण अजिंठा चौफुलीपासून तातडीने सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी मागणी केली होती. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार डीपीडीसीची बैठक आटोपल्यावर पालकमंत्र्यांनी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना केली. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.