शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून चार लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर व लग्नसमारंभामध्येदेखील गर्दी न करण्याबाबत नियम आखून दिले आहेत. मात्र तरीही शहरात प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून चार लाख ७२ हजार रुपयांची वसुली केली आहे. तसेच कोरोनाकाळात प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर यापुढे दंडासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियादेखील राबविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एकीकडे प्रादुर्भाव वाढत असतानाही शहरातील नागरिक गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. यामुळे मनपा प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. यासह लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमात गर्दी करणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मनपा प्रशासनाने मास्क न घालणाऱ्या २०७ जणांना दंड केला आहे, तर गर्दी करणाऱ्या १४ मंगल कार्यालय व लॉन्सच्या मालकांवरदेखील प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. यासह किरकोळ विक्रेत्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली आहे.

मोहीम अधिक तीव्र होणार

शहरात आता दररोज कोरोनाचे ३००हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तरीही बाजार पट्ट्यात अनेक नागरिक बेजबाबदारपणे मास्क न घालताच फिरत आहेत. यासह अनेक भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही निदर्शनात येत आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र होणार आहे तसेच ज्या दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर गर्दी आढळून येईल, अशी दुकाने सील करून दुकानमालकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

९० टक्के नागरिक घालताहेत मास्क; मात्र गर्दीवर नियंत्रण नाही

मनपाच्या कारवाईनंतर शहरातील नागरिकांवर काही प्रमाणात शिस्त लागलेली दिसून येत आहे. बाजारपट्ट्यात अनेक नागरिक तोंडाला मास्क लावूनच फिरत आहेत. मात्र शहरातील गर्दीवर अंकुश लावण्यात आतापर्यंत मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. आठवडे बाजार बंद असला तरीही गल्लीबोळात अनेक विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे गर्दी होतच आहे. याबाबतदेखील मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

मास्क न लावणाऱ्यांकडून वसूल रक्कम - एक लाख ३२ हजार

मंगल कार्यालय चालकांकडून वसूल रक्कम - तीन लाख ३४ लाख