शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पावणे चार लाखांवर शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या ...

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या अनुदानासाठी जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली असून त्यांना या अनुदानाची केवळ प्रतीक्षाच आहे. दरम्यान, राज्य शासनाने घोषणा तर केली, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊन त्याचा खरोखर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना शेतकरी मात्र राबत राहिला. इतकेच नव्हे राज्याच्या आर्थिक विकासाची आकडेवारी पाहता इतर क्षेत्रांपेक्षा कृषी क्षेत्रानेच आर्थिक विकास दर वाढीला हातभार लावल्याचे दिसून आले. अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या या बळीराजासाठी सरकार विविध घोषणा करते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी व लाभाची प्रतीक्षा करावी लागते, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे शेतकरी कर्ज माफीची घोषणा झाली, मात्र त्यात काही ना काही अडचणींमुळे अनेक जण त्यापासून वंचित राहिले. यात भरीस भर राज्य शासनाने नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरत आहे. मात्र त्यांना अजूनही त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

२०१५-१६मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी केली परतफेड

नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहता सर्वाधिक एक लाख ५५ हजार ६७२ शेतकऱ्यांनी २०१५-१६ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे तर सर्वात कमी ६१ हजार ८६ शेतकऱ्यांनी २०१७-१८ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे. सरकारने ५० हजारांच्या अनुदानाची घोषणा केल्याने शेतकरी ते मिळण्याची प्रतीक्षा करीत राहिले व दुसरीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या उलट वाढत गेल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

——————

शेतकरी कर्जमाफी वेळीदेखील सरकारने अनुदानाची घोषणा केली. मात्र एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला नाही. सरकार घोषणा तर करते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहतो. ५० हजारांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यास मिळावा.

- एस. बी. पाटील, समन्वयक, राज्य किसान क्रांती