शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यातील पावणे चार लाखांवर शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या ...

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या अनुदानासाठी जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली असून त्यांना या अनुदानाची केवळ प्रतीक्षाच आहे. दरम्यान, राज्य शासनाने घोषणा तर केली, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊन त्याचा खरोखर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना शेतकरी मात्र राबत राहिला. इतकेच नव्हे राज्याच्या आर्थिक विकासाची आकडेवारी पाहता इतर क्षेत्रांपेक्षा कृषी क्षेत्रानेच आर्थिक विकास दर वाढीला हातभार लावल्याचे दिसून आले. अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या या बळीराजासाठी सरकार विविध घोषणा करते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी व लाभाची प्रतीक्षा करावी लागते, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे शेतकरी कर्ज माफीची घोषणा झाली, मात्र त्यात काही ना काही अडचणींमुळे अनेक जण त्यापासून वंचित राहिले. यात भरीस भर राज्य शासनाने नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरत आहे. मात्र त्यांना अजूनही त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

२०१५-१६मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी केली परतफेड

नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहता सर्वाधिक एक लाख ५५ हजार ६७२ शेतकऱ्यांनी २०१५-१६ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे तर सर्वात कमी ६१ हजार ८६ शेतकऱ्यांनी २०१७-१८ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे. सरकारने ५० हजारांच्या अनुदानाची घोषणा केल्याने शेतकरी ते मिळण्याची प्रतीक्षा करीत राहिले व दुसरीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या उलट वाढत गेल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

——————

शेतकरी कर्जमाफी वेळीदेखील सरकारने अनुदानाची घोषणा केली. मात्र एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला नाही. सरकार घोषणा तर करते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहतो. ५० हजारांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यास मिळावा.

- एस. बी. पाटील, समन्वयक, राज्य किसान क्रांती