शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जिल्ह्यातील पावणे चार लाखांवर शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या ...

जळगाव : नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, या अनुदानासाठी जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली असून त्यांना या अनुदानाची केवळ प्रतीक्षाच आहे. दरम्यान, राज्य शासनाने घोषणा तर केली, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊन त्याचा खरोखर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना शेतकरी मात्र राबत राहिला. इतकेच नव्हे राज्याच्या आर्थिक विकासाची आकडेवारी पाहता इतर क्षेत्रांपेक्षा कृषी क्षेत्रानेच आर्थिक विकास दर वाढीला हातभार लावल्याचे दिसून आले. अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या या बळीराजासाठी सरकार विविध घोषणा करते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी व लाभाची प्रतीक्षा करावी लागते, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे शेतकरी कर्ज माफीची घोषणा झाली, मात्र त्यात काही ना काही अडचणींमुळे अनेक जण त्यापासून वंचित राहिले. यात भरीस भर राज्य शासनाने नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार ३९६ शेतकरी पात्र ठरत आहे. मात्र त्यांना अजूनही त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

२०१५-१६मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी केली परतफेड

नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहता सर्वाधिक एक लाख ५५ हजार ६७२ शेतकऱ्यांनी २०१५-१६ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे तर सर्वात कमी ६१ हजार ८६ शेतकऱ्यांनी २०१७-१८ या वर्षात कृषी कर्जाची परतफेड केली आहे. सरकारने ५० हजारांच्या अनुदानाची घोषणा केल्याने शेतकरी ते मिळण्याची प्रतीक्षा करीत राहिले व दुसरीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या उलट वाढत गेल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

——————

शेतकरी कर्जमाफी वेळीदेखील सरकारने अनुदानाची घोषणा केली. मात्र एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला नाही. सरकार घोषणा तर करते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहतो. ५० हजारांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यास मिळावा.

- एस. बी. पाटील, समन्वयक, राज्य किसान क्रांती