शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

चक्रीवादळामुळे गुजरातकडे जाणाऱ्या चार एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

खबरदारी : तर गांधीधाम व रामेश्वरम्‌-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यँतच धावणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र, गुजरात व केरळच्या किनारपट्टीवर ...

खबरदारी : तर गांधीधाम व रामेश्वरम्‌-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यँतच धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र, गुजरात व केरळच्या किनारपट्टीवर ''तौक्ते'' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे गुजरातकडे जाणाऱ्या चार सुपरफास्ट गाड्या रद्द केल्या आहेत. पुरी-गांधीधाम व रामेश्वरम्‌-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे गुजरातकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा चक्रीवादळामुळे चार सुपरफास्ट रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या चार गाड्या तीन दिवस रद्द केल्या आहेत. तसेच गुजरातकडून येतानाही या गाड्या रद्द राहणार आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या या चार गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर गाडी क्रमांक (०२९७४) पुरी-गांधीधम एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०६७३३) रामेश्वरम्‌-ओखा एक्स्प्रेस या दोन्ही सुपरफास्ट गाड्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर फक्त अहमदाबादपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, या सर्व गाड्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.

इन्फो :

चक्रीवादळामुळे या गाड्या आहेत रद्द...

तौक्ते या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या चार गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये गाडी क्रमांक (०९२०६) हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८४०१) पुरी-ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०९४) पोरबंदर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०९२३८) राजकोट-रेवा एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

इन्फो :

तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार

रेल्वे प्रशासनातर्फे चक्रीवादळामुळे ज्या गाड्या रद्द केल्या आहेत, त्या गाड्यांचा पूर्ण परतावा प्रवाशांना देण्यात येणार आहे. तिकिटांचा परतावा घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.