शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

हिंस्त्र प्राण्यांच्या अधिवासाबाबत वनविभागाने माहिती ठेवणे गरजेचे, वन्यअभ्यासकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:44 IST

बिबटय़ाचा हल्ला प्रकरण

ठळक मुद्देनागरिकांनी सतर्क राहणे आवश्यकअधिवास जपला जावा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला रोखण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू असून यासाठी नागरिकांना दिलेल्या सूचनांचे त्यांनी पाहणी केले आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे हिंस्त्र प्राणी कोणत्या ठिकाणी आहे, या बाबत वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी माहिती ठेवणेही गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप रोखणे काळाजी गरज असल्याचे काही जणांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाचा धुमाकूळ वाढतच असून मंगळवारी पहाटे त्याने सहावा बळी घेतला. यापूर्वीच संतप्त झालेल्या नागरिकांच्या संतापामध्ये या घटनेने पुन्हा भर घातली असून प्रशासनास या रोषास सामोरे जावे लागत आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर वन्यप्रेमी, निवृत्त वन अधिकारी यांच्या प्रतिक्रिया  जाणून घेतल्या असता वरील सूर उमटला. 

अधिकारी, कर्मचा-यांनी जागृत रहावेकोणतीही घटना झाल्यानंतर उपाययोजनांना वेग येतो, मात्र त्यापूर्वीच ती कशी रोखता येईल, याबाबत सतर्क राहिले तर घटना टाळता येतात. त्यासाठी वनांमध्ये हिंस्त्र प्राणी कोठे आहे, याची माहिती वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्राण्यांचा शोध घेण्यास मदत होते, असे मत निवृत्त वन अधिकारी सु.सु. पाटील यांनी व्यक्त केले. 

सहकार्य आवश्यकबिबटय़ाचा शोध सुरू आहे. मात्र याबाबत नागरिकांनी बाहेर झोपू नये, उघडय़ावर शौचास जावू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे, त्यांचे पालन करावे. पशूधन उघडय़ावर बांधल्यास पिंज:यातील भक्षाकडे बिबटय़ा येत नाही, त्यामुळे पशूधन बंदीस्त भागात ठेवणे व इतर बाबतीतही नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे, अशी अपेक्षा मानद वन्य जीव संरक्षक राजेश ठोंबरे यांनी व्यक्त केली. 

अधिवास जपला जावाजंगल तोड मोठय़ा प्रमाणात वाढल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. प्राण्यांचे भक्ष, आसरा नष्ट होत असल्याने त्यांचा अधिवास धोक्यात येऊन अशा घटना वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करीत जंगलांमधील मानवी हस्तक्षेप रोखला पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी व्यक्त केले.  

उपाययोजनांना वेगबिबटय़ाला पकडण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले असून पिंजरेही वाढविण्यात आले आहे. बिबटय़ाला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहन  वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी केले.