शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

हिंस्त्र प्राण्यांच्या अधिवासाबाबत वनविभागाने माहिती ठेवणे गरजेचे, वन्यअभ्यासकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:44 IST

बिबटय़ाचा हल्ला प्रकरण

ठळक मुद्देनागरिकांनी सतर्क राहणे आवश्यकअधिवास जपला जावा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला रोखण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू असून यासाठी नागरिकांना दिलेल्या सूचनांचे त्यांनी पाहणी केले आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे हिंस्त्र प्राणी कोणत्या ठिकाणी आहे, या बाबत वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी माहिती ठेवणेही गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप रोखणे काळाजी गरज असल्याचे काही जणांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाचा धुमाकूळ वाढतच असून मंगळवारी पहाटे त्याने सहावा बळी घेतला. यापूर्वीच संतप्त झालेल्या नागरिकांच्या संतापामध्ये या घटनेने पुन्हा भर घातली असून प्रशासनास या रोषास सामोरे जावे लागत आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर वन्यप्रेमी, निवृत्त वन अधिकारी यांच्या प्रतिक्रिया  जाणून घेतल्या असता वरील सूर उमटला. 

अधिकारी, कर्मचा-यांनी जागृत रहावेकोणतीही घटना झाल्यानंतर उपाययोजनांना वेग येतो, मात्र त्यापूर्वीच ती कशी रोखता येईल, याबाबत सतर्क राहिले तर घटना टाळता येतात. त्यासाठी वनांमध्ये हिंस्त्र प्राणी कोठे आहे, याची माहिती वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्राण्यांचा शोध घेण्यास मदत होते, असे मत निवृत्त वन अधिकारी सु.सु. पाटील यांनी व्यक्त केले. 

सहकार्य आवश्यकबिबटय़ाचा शोध सुरू आहे. मात्र याबाबत नागरिकांनी बाहेर झोपू नये, उघडय़ावर शौचास जावू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे, त्यांचे पालन करावे. पशूधन उघडय़ावर बांधल्यास पिंज:यातील भक्षाकडे बिबटय़ा येत नाही, त्यामुळे पशूधन बंदीस्त भागात ठेवणे व इतर बाबतीतही नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे, अशी अपेक्षा मानद वन्य जीव संरक्षक राजेश ठोंबरे यांनी व्यक्त केली. 

अधिवास जपला जावाजंगल तोड मोठय़ा प्रमाणात वाढल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. प्राण्यांचे भक्ष, आसरा नष्ट होत असल्याने त्यांचा अधिवास धोक्यात येऊन अशा घटना वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करीत जंगलांमधील मानवी हस्तक्षेप रोखला पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी व्यक्त केले.  

उपाययोजनांना वेगबिबटय़ाला पकडण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले असून पिंजरेही वाढविण्यात आले आहे. बिबटय़ाला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहन  वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी केले.