शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

परप्रांतीय श्रमिकांनी आता घेतला रिक्षांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:28 IST

परप्रांतीय श्रमिक आता मुंबईहुन रिक्षाने परतू लागले आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्ग रोगाच्या भीतीने व लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेले श्रमिक मजुरांसह मुंबईतील रिक्षा चालकांनीही मुंबापुरी सोडणे सुरू केले आहे. पायी, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांपाठोपाठ आता तीन चाकी आटो रिक्षानेही परप्रांतीय श्रमिकांचा प्रवास सुरू केला असून, झारखंड राज्यात जाणाऱ्या मुंबईतील अनेक रिक्षा सोमवारी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या.एरव्ही मुंबई उपनगरात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मुंबई पासिंगच्या अनेक रिक्षा सोमवारी सकाळपासून मुंबई नागपूर एशिया महामार्ग क्र. ४७ वर सुसाट धावताना दिसून आल्या, तर काही रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. या रिक्षांचा प्रवास मुंबई उपनगरातून थेट झारखंड राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तब्बल बाराशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा आहे.मुंबई उपनगरात रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करणारे हे श्रमिक आपल्या कुटुंब व नातेवाईकांसह झारखंड जायला निघाले होते. अगदी वैद्यकीय तपासण्या आणि ट्रांझिक पास घेऊन एक रिक्षात दाटीवाटीने ५ ते ७ प्रवाशी प्रवास करीत होते.रविवारी सायंकाळपासून बांद्रा, सायन, दादर आणि ठाणे उपनगरीय परिसरातून निघालेल्या या रिक्षा रात्रभर प्रवास करून सकाळी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या. थकलेले श्रमिक रस्त्याचा महामार्गाच्या कडेला ८१ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या व्हॉल्वमधील पाणी गळती पाहून प्रातर्विधी व अंघोळीसाठी थांबल्या होत्या. अन्न छत्र किंवा मिळेल तेथे जेवण आणि सावली तेथे थांबा आणि पाण्याची सोय तेथे अंघोळ अशी दिनचर्या घर गाठेपर्यंत या श्रमिकांची सोबत कुटुंबातील महिलाही असल्याने त्यांचा हा लांब पल्ल्याचा प्रवास काळजीचा होय."मुंबईत लॉक डाउन असल्यामुळे रिक्षा बंद आहेत. उदरनिर्वाह करण्यास पैशांची चणचण. महानगरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने कोरोना लागण होण्याचा धोका आहे. कुटुंबाची सुरक्षितता महत्वाची म्हणून रिक्षानेच कुटुंबासह झारखंड येथील आपल्या गावाकडे निघालो आहे."-प्रदीप मंडल, गिरडिह (झारखंड)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर