शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव : तीन वर्षांपासून राज्य शासनाचे आदर्श शेतकऱ्यांचे पुरस्कार रखडले

By ajay.patil | Updated: April 3, 2023 18:25 IST

शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो.

जळगाव - शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारात या पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वाटपच झाले नसून, जिल्हा कृषी विभागाने पाठविलेले तीन वर्षांपासूनचे प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडून आहेत.

जळगाव जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, शेतकरी आपले प्रस्ताव तयार करून, जिल्हा कृषी विभागाकडे पाठवीत आहेत, तर कृषी विभागदेखील हेच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीत आहेत. मात्र, राज्य शासनाला कृषी पुरस्कारांसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकरी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे काम करत आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आगळेवेगळे काम सुरू ठेवले आहे. अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने १३ प्रकारांत पुरस्कार दिले जात असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत.

या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण नाही...

२०१९-२०२०२०-२१

२०२१-२२

२०१८-१९ चे पुरस्कार २०२१ मध्ये करण्यात आले वितरित

२०१७, १८ व १९ या तीन वर्षांतदेखील पुरस्कार रखडले होते. मात्र, ३१ मार्च २०२१ रोजी हे पुरस्कार महाविकास आघाडीच्या काळात वितरित करण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील तीन, तर जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश होता. मात्र, त्यानंतर तीन वर्षांपासून कृषी विभागाकडून केवळ प्रस्ताव जमा करून, ते राज्याकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. यंदाही प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र पुरस्कार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे.

कृषी विभागाकडे ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते ते प्रस्ताव कृषी विभागाकडून राज्य स्तरावर पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील.-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक