शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जळगाव : तीन वर्षांपासून राज्य शासनाचे आदर्श शेतकऱ्यांचे पुरस्कार रखडले

By ajay.patil | Updated: April 3, 2023 18:25 IST

शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो.

जळगाव - शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारात या पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वाटपच झाले नसून, जिल्हा कृषी विभागाने पाठविलेले तीन वर्षांपासूनचे प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडून आहेत.

जळगाव जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, शेतकरी आपले प्रस्ताव तयार करून, जिल्हा कृषी विभागाकडे पाठवीत आहेत, तर कृषी विभागदेखील हेच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीत आहेत. मात्र, राज्य शासनाला कृषी पुरस्कारांसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकरी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे काम करत आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आगळेवेगळे काम सुरू ठेवले आहे. अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने १३ प्रकारांत पुरस्कार दिले जात असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत.

या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण नाही...

२०१९-२०२०२०-२१

२०२१-२२

२०१८-१९ चे पुरस्कार २०२१ मध्ये करण्यात आले वितरित

२०१७, १८ व १९ या तीन वर्षांतदेखील पुरस्कार रखडले होते. मात्र, ३१ मार्च २०२१ रोजी हे पुरस्कार महाविकास आघाडीच्या काळात वितरित करण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील तीन, तर जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश होता. मात्र, त्यानंतर तीन वर्षांपासून कृषी विभागाकडून केवळ प्रस्ताव जमा करून, ते राज्याकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. यंदाही प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र पुरस्कार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे.

कृषी विभागाकडे ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते ते प्रस्ताव कृषी विभागाकडून राज्य स्तरावर पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील.-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक