शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

चारा सडल्याने दूध उत्पादनही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:27 IST

अमळनेर तालुक्यातील स्थिती : पिकांचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. जनावरांना गवत आणि चारा सडल्याने खायला काहीच नसल्याने दूध उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येत आहे.गेली चार वर्षे कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले, तर यंदा ओल्या दुष्काळाने होत्याचे नव्हते झाले आहे. ज्वारी, कापूस, मका अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ््यानंतर गवत उगवल्याने आणि ज्वारी, बाजरी, मक्याची ताटे जनावरांना चारा म्हणून उपलब्ध होतो. मात्र यंदा भरमसाट प्रमाणात पाऊस पडल्याने चारा, गवत सडल्याने जनावरे खात नाहीत. परिणामी हिरवा चारा नसल्याने गाई-म्हशींचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार चारा नसल्याने बैल व इतर जनावरे विक्रीला येत आहेत.आमदार वाघ यांनी जिल्हा कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तहसीलदार यांना सर्वच ठिकाणी पंचनामे करुन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. नंदगाव शिवारात प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी पाहणी केली. तलाठी पराग पाटील यांनी पंचनामे केले. त्यावेळी नायब तहसीलदार आर.एस.चौधरी, तलाठी पराग पाटील, उपसरपंच नंदगाव सदाशिव बडगुजर, नितीन पाटील, गणेश पाटील, अरुण पाटील, किशोर पाटील, शिवानंद पाटील उपस्थित होते.

चाऱ्याचा प्रश्न गंभीरतालुक्यातील सुमारे १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यात ४३ हजार शेतकºयांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. काही ठिकाणी शेतांमधील पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र गवतही पाण्याखाली हाहिल्यान व मका, ज्वारी पिके सडल्याने सध्या तालुकाभरात पशुधनासाठी चाºयाचा प्रश्न गंभीर आहे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी सांगितले.