शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महापुराने ६०० दुकानदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST

चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक ...

चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक सावरण्याचा प्रयत्न करीत असून, गुरुवारी काही दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पुराच्या तडाख्यातून सावरलेले चाळीसगाव हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

दरम्यान, गुरुवारी पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू घेण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. चाळीसगाव शहरात तितूर नदीपात्रालगत असणाऱ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी १५ ते २० फुटांपर्यंत शिरले होते. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. डोंगरी व तितूर नदीचा संगम या दुकानांपासून अवघ्या हजार पावलांवर होत असल्याने याच परिसरात पुराच्या प्रवाहाने मोठी धडक दिली होती. यामुळेच पुराचे पाणी तहसील कार्यालयाच्या वीर सावरकर चौकात, तर घाट रोडवरील डॉ. पूर्णपात्रे रुग्णालयापर्यंत पोहोचले होते.

६०० दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टील भांडी, किराणा सामान, रेडिमेड कपडे, साडी, मसाले, खाद्यपदार्थ, चपला - बुट, फळांची दुकाने, फर्निचर, आदी दुकानांचा यात समावेश आहे. बुधवारी आणि गुरुवारी देखील दुकानदारांनी पुराच्या पाण्यात वाहून आलेली घाण, गाळ यांची स्वच्छता केली. अजूनही शिवाजी घाट परिसरात गाळ साचलेला आहे.

.............

चौकट

भिजलेल्या वस्तू, कपडे, भांडी घेण्यासाठी गर्दी

पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू मिळेल त्या किमतीत विकण्याशिवाय या दुकानदारांकडे दुसरा पर्याय नसल्याने तयार कपडे, किराणा सामान, भांडी, साड्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यात महिला वर्गाची संख्या सर्वाधिक होती.

............. चौकट

दुकाने सावरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार

शिवाजी घाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, दुकानदारांना पुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी आहे.

1...डोळ्यात अश्रू असताना पूरग्रस्त नागरिक, दुकानदार या तडाख्यातून आता स्वतःला सावरत आहे.

2...पंचनामे झाल्याने तातडीने शासनाने मदतीचा हात पुढे करावा. पंचनाम्यांचा नुसता फार्स नको, अशा प्रतिक्रिया दुकानदार व नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या.

3...किराणा सामान, मसाले व खाद्यपदार्थ पुराच्या पाण्यात भिजल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.