शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीतून घेतली वर्कशॉर्पयत भरारी

By admin | Updated: June 3, 2017 14:23 IST

एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.

विजय पाटील  / ऑनलाईन लोकमतआडगाव, जि. जळगाव, दि. 3 - उंबरखेडेचे रहिवासी व आडगाव येथील कल्पेश इंजिनीअरिंग वर्कशॉपचे मालक अशोक शिवाजी चव्हाण यांनी झोपडीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत वर्कशॉप र्पयत मजल मारली आहे. एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.  अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले अशोक चव्हाण यांचा  इतिहास पाहिल तर उंबरखेड येथे एका छोटय़ाशा झोपडीत वडील शिवाजी चव्हाण यांनी  लोहाराचा व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुले व दोन मुली. अत्पल्प मजुरीवर एवढय़ा मोठा कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा? असा  प्रश्न शिवाजी चव्हाण यांच्यासमोर ठाकला होता. मुलगा अशोक चव्हाण यांनी आपल्या आई-वडिलांना व्यवसायात मदत करून  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंबरखेडे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आपला व्यवसाय वाढावा व भावांच्या हातालाही काम मिळावे म्हणून  गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने आडगावजवळ साधारणत: 20 आर इतकी जमीन घेतली. सदर जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेडच्या सहकार्याने अत्याधुनिक यंत्रासह भले मोठे वर्कशॉप उभारले. त्यात त्यांनी ट्रॅक्टरचे पलटी नांगर व टिलर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.  चव्हाण यांचे नांगर व टिलर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात शेतक:यांचे पसंतीचे अवजार ठरल्याने  मागणी वाढली. यामुळेच त्यांना मागील महिन्यात जळगाव काही वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री एकनाथराव खडसे व विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर पुन्हा 26 जानेवारी 2016 रोजी मालेगाव येथील एका कार्यक्रमात कृषी अवजारात विशेष कामगिरी केल्याबद्दल सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी अशोक चव्हाण यांचे कुटुंब, उंबरखेड व आडगाव येथील नागरिक उपस्थित होते.