शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पाच वर्षांत ८५६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा ही संख्या वाढली आहे.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे, पेरणी करून न उगविलेले पीक, गेल्या वर्षी झालेला अतिपाऊस, दुबार पेरणी या साऱ्यात शेतकऱ्याच्या हातातून खरीप हंगाम गेला. तसेच कर्जमाफीबाबतही अनिश्चितता यामुळे खाजगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत बळीराजा पडला. या साऱ्यात खचलेल्या बळीराजाने मृत्यूला कवटाळले व ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

लॉकडाऊनच्या काळात वाढली संख्या

गेल्या पाच वर्षांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ती वाढतच गेली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरी होते. मात्र बळीराजाची विवंचना काही संपली नाही. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी पैसा कसा उभा करायचा या विवंचनेत शेतकरी सापडला. यासोबतच बँकांसमोर असलेल्या रांगा पाहता कर्ज कसे उपलब्ध होणार यामुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

अनुदानही झाले होते ‘लॉक’

लॉकडाऊनच्या काळात प्रवास बंद झाल्याने समिती सदस्य येणे शक्य नसल्याने व शासनाने कार्यालयातील उपस्थिती, बैठकांवर घातलेले निर्बंध यामुळे शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीची बैठकही होऊ शकली नव्हती. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कोरोनाच्या संकटाने मदतही मिळू शकत नव्हती. त्यानंतर मात्र ऑगस्टपासून बैठका सुरू झाल्याने प्रकरणे मार्गी लागू लागली.

४०९ जणांना मदत

पाच वर्षांत जिल्ह्यात ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीकडे मोबदल्यासाठी प्रकरणे दाखल झाली. त्यावर निर्णय होऊन ४०९ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आली. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ४४७ प्रकरणे अपात्र ठरली.