शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दहा वर्षात पाच वाघांचा तर तीन वर्षात १२ बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:25 IST

वनविभागाच्या उपाययोजना तोकड्या, बहुंताश प्राण्यांनी केले स्थलांतर

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील स्थिती

सुशील देवकरजळगाव : जैवविविधता संपन्न जंगलांची तोड होत असल्याने अन्नसाखळीला होत चाललेला धोका, जंगलांमध्ये वाढता मानवी वावर आदीमुळे वाघ, बिबट्या यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या १० वर्षात ५ वाघांचा तर ३ वर्षात केवळ जळगाव वनविभागातच १२ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.भुसावळ तालुक्यात नुकताच बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यापूर्वी वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.एकीकडे वाघ लुप्त होत असताना जळगाव व यावल वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढत आहे. यावर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण करणे अपेक्षित असताना त्याकडे वनविभाग व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सातत्याने वाघांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत.गत दहा वर्षात ५ वाघांचे मृत्यू झाले असून त्यात एका बछड्याचाही समावेश आहे. २००९ च्या काळात कुºहा वढोदा रस्त्यावर पट्टेदार वाघाचा एक महिन्याचा छावा अपघातात दगावला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१६ रोजी वायला शिवारात १५ वर्षांचा पट्टेदार वाघ तोंड फाटलेल्या अवस्थेत मृत आढळून आला होता.२३ मार्च २०१८ सुकळी शिवारात १६ वर्ष वयाची वाघीण मृत्यू पावल्याचे आढळून आले. तर यावल वनविभागाच्या हद्दीतही तिढ्या भागात वाघीणीची हत्याचा झाल्याची घटना घडली होती. मात्र ती सिद्ध होऊ शकली नाही.सन २०१८ मध्येच मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा नदीपात्रात वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. शेतीच्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे आढळले होते.उपवनसंरक्षक डी.डब्लू.पगार यांनी सांगितले की, बहुतांश बिबटे हे वनक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे बुद्धपौर्णिमेला केल्या जाणाऱ्या प्राणी गणनेतही हे बिबटे पाणवठ्यांवर आढळून येत नाहीत.२०१६-१७ मध्ये ५, २०१७-१८ मध्ये ३ बिबटे आढळून आले होते. तर २०१८-१९ मध्ये एकही बिबट्या आढळून आला नव्हता. तर वनविभागाने २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रत्येकी १- १ व २०१८-१९ मध्ये २ बिबटे जेरबंद केले. पारोळा व जामनेर येथे विहीरीत पडलेल्या बिबट्यांना बाहेर काढले होते.जिल्ह्यात सुमारे ४० बिबटेप्राणीगणनेच्यावेळी पाणवठ्यावर आलेल्याच प्राण्यांची गणना होत असल्याने बिबट्यांची अचूक संख्या सांगणे कठीण असल्याचे मानले जाते.मात्र तरीही जिल्ह्यात सुमारे ३० ते ४० बिबटे असल्याचा अंदाज वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.३ वर्षात १२ बिबट्यांचे मृत्यूगत तीन वर्षात जिल्ह्यात केवळ जळगाव वनविभागात तब्बल १२ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील काही नैसर्गिक तर काही हत्या आहेत. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ५ बिबट्यांचे मृत्यू झाले असून पारोळा तालुक्यात १, बोदवड तालुक्यात १, एरंडोल १, जळगाव तालुक्यात २, तर चाळीसगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव विमानतळावर जेसीबीच्या धक्क्याने बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता. २०१६-१७ मध्ये २ बिबट्यांचा, २०१७-१८ मध्ये ६ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ५ नैसर्गिक मृत्यू होते. तर १ अपघात झाला होता. २०१८-१९ मध्ये ४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील वनक्षेत्रात ७ वाघजिल्ह्यात वढोदा वनक्षेत्रात ६ तर यावल वनक्षेत्रात १ असे ७ वाघ आहेत. त्यात २-३ वाघीण आहेत. त्यामुळे प्रजनन प्रक्रिया सुरू राहून वाघांच्या संख्येत भविष्यात आणखी वाढ होणार आहे.