शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

केकत निंभोऱ्यात दुरई खाल्ल्याने पाच जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:13 IST

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : ४० जनावरे वाचविण्यात पशुवैद्यकीय अधिकाºयांना यश

पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या केकत निंभोरा येथे शेतातील दुरई खाल्ल्याने २ बैल, २ गायी व १ म्हैस अशी एकूण पाच जनावरे जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना २५ रोजी घडली. सुमारे ४० जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.माहिती अशी केकत निंभोरा येथील गुराखी प्रल्हाद व्यवहारे २५ रोजी नेहमीप्रमाणे गुरे जंगलात चारण्यासाठी घेऊन गेले. चरता चरता जनावरे संजय बाबूलाल पाटील यांच्या गोंडखेल रोडवरील दुरईच्या शेतात घुसली. शेतातील दुरई खाल्ल्याने एका पाठोपाठ एक जनावरे जमिनीवर कोसळल्याने प्रल्हाद व्यवहारे घाबरले. त्यांनी जनावरांचे व शेताचे मालक यांना भ्रमणध्वनीवरून झालेला प्रकार कथन केला. घटनेची माहिती गावात मिळताच पोलीस पाटील गोरखनाथ बहिरे, दशरथ पाटील, कपिल पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह शेत व जनावरांचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. एकनाथ खोडके यांच्याशी संपर्क साधला. डॉ. खोडके हे पशुसंवर्धन सेवक डॉ. संजय पाटील तत्काळ शेतात आले. जनावरांवर उपचार सुरू केले. शालिक माधव पाटील व बाळू रामदास महाले यांची प्रत्येकी एक गाय, गोविंदा भिकारी पाटील व भारत नामदेव चौधरी यांचा प्रत्येकी एक बैल, रमेश बाबूराव मोरे यांची एक म्हैस अशा पाच जनावरांचा जागीच मृत्यू झाला. दुरई खाल्ल्याने जनावरे मृत्यूचे सत्र सुरूच आहे.