शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:33 IST

भुसावळ , जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम ...

ठळक मुद्देदहावीच्या १५, तर बारावीच्या पाच ऑनलाईन संवाद सत्राचा महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी घेतला लाभलॉकडाउनचा घेतला सदुपयोग

भुसावळ, जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती येथील मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमांतर्गत दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आले.आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींना पाहण्याचे व ऐकण्याचे आकर्षण प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असते. हेच आकर्षण पूर्ण करण्यासाठी डॉ.जगदीश पाटील यांनी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद असा उपक्रम राबवला. याअंतर्गत प्रारंभी दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. डॉ.सुनील विभुते (निर्णय), डॉ.महेंद्र कदम (आजी : कुटुंबाचं आगळ), ज.वि. पवार (तू झालास मूक समाजाचा नायक), वीरा राठोड (मनक्या पेरेन लागा), डॉ.नीलिमा गुंडी (बोलतो मराठी...), डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे (कर्ते सुधारक कर्वे), आसावरी काकडे (खोद आणखी थोडेसे), डॉ.विजया वाड (बालसाहित्यिका : गिरिजा कीर), अरविंद जगताप (आप्पांचे पत्र), नीरजा (आश्वासक चित्र), द.भा. धामणस्कर (वस्तू), सुप्रिया खोत (गोष्ट अरूणिमाची) अशा बारा लेखक-कवींसह डॉ. दिपाली पूर्णपात्रे (सोनाली पाठातील पात्र), हभप चारूदत्त आफळे महाराज (संत रामदास यांच्या उत्तम लक्षण काव्यावर निरूपण) आणि बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी समारोपीय संवाद साधला.अशा पद्धतीने दहावीची पंधरा ऑनलाईन संवाद सत्र पार पडली.याच धर्तीवर बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला.हिरा बनसोडे (आरशातली स्त्री), डॉ. प्रतिमा इंगोले (गढी), कल्पना दुधाळ (रोज मातीत), अनुराधा प्रभुदेसाई (वीरांना सलामी) अशा चार लेखक-कवींनी शिक्षकांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल यासंदर्भात शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून सत्राचा समारोप केला. अशा पद्धतीने बारावीची पाच ऑनलाईन संवाद सत्र पार पडली. राज्यात पहिल्यांदाच दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत वीस संवाद सत्रे पार पडून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.पाटील यांनी साधली. या उपक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ऑनलाईन संवाद सत्रात सहभागी झालेल्या लेखक-कवींच्या सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग युट्युबवर अपलोड करून सर्वांसाठी खुले करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठीBhusawalभुसावळ